शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पोलिस उपायुक्त, कळमना पोलिस निरीक्षकांना समन्स

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 12, 2023 18:19 IST

हायकोर्ट : तांदूळ अवैधपणे जप्त केल्याचा आरोप

नागपूर : एक लाख रुपये लाच दिली नाही म्हणून, कळमना पोलिसांनी १० हजार किलो तांदूळ ट्रकसह जप्त केल्याचा गंभीर आरोप दोन धान्य व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिस उपायुक्त झोन-३ व कळमनाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना समन्स बजावून येत्या १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात हजर राहण्याचा व संबंधित आरोपावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे.

प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नीलेश भावरिया व फैजल खान मुस्तफा खान अशी धान्य व्यापाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोषी पोलिसांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. या व्यापाऱ्यांनी संबंधित तांदूळ भारती ग्रुपला विकला आहे. तो तांदूळ ट्रकमधून वांजरा येथे नेत असताना कळमना पोलिसांनी ट्रक अडवून आवश्यक कागदपत्रे मागितली. त्यानुसार, त्यांना सर्व कागदपत्रे दाखविण्यात आली. असे असताना त्यांनी ट्रक सोडण्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली.

व्यवहार कायदेशीर असल्यामुळे व्यापाऱ्यांनी लाच देण्यास नकार दिला. परिणामी, पोलिसांनी तांदळासह ट्रकही जप्त केला. त्यानंतर चार महिने एफआयआर दाखल करण्यात आला नाही. तेव्हापर्यंत तांदूळ व ट्रक पोलिसांनी अवैधरित्या जप्तीत ठेवला, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. कौस्तुभ फुले यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस