शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

धर्मातील चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:47 IST

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणताही धर्म असो त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत, तर काही वाईट. सर्वच धर्मात स्त्रियांवर अत्याचार झालेत, त्यांना दासी म्हणून वागविले. त्यामुळे धर्मांमधील वाईट गोष्टींची वजाबाकी अन् चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम होय, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसेक्युलॅरिझमवर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणताही धर्म असो त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत, तर काही वाईट. सर्वच धर्मात स्त्रियांवर अत्याचार झालेत, त्यांना दासी म्हणून वागविले. त्यामुळे धर्मांमधील वाईट गोष्टींची वजाबाकी अन् चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम होय, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्ष आणि अमर सेवा मंडळाचे संस्थापक स्व. गोविंदराव वंजारी यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त ‘सेक्युलॅरिझम’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी होत्या. व्यासपीठावर अमर सेवा मंडळाचे सचिव अ‍ॅड अभिजित वंजारी उपस्थित होते. द्वादशीवार म्हणाले, सेक्युलॅरिझम ही स्वातंत्र्य लढ्याने दिलेली देणगी, विधायक संकल्पना आहे. देशातील सर्वांचा देशावर समान अधिकार आहे. तो कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा नाही असे महात्मा गांधींनी म्हटले. गांधीजी ईश्वर-अल्लात फरक मानत नसत. ते येशू ख्रिस्ताची गोष्ट सांगत, गुरु ग्रंथसाहिबची कवन म्हणत. जवाहरलाल नेहरुंनी सेक्युलॅरिझमला लोकशाहीचा पाया संबोधून त्या शिवाय लोकशाही जिवंत राहू शकत नसल्याचे सांगितले. देश अखंड ठेवण्यासाठी धर्माच्या वर उठून राष्ट्रवादाच्या पातळीवर गेले पाहिजे, असे सरदार पटेलांनी सांगितले. मोहम्मद पैगंबरांनीही आपल्या राज्यात ज्यू लोकांची संख्या असल्यामुळे जेरुसलेमकडे तोंड करून प्रार्थना करण्याचा फतवा काढला होता. त्यामुळे सेक्युलॅरिझम हे सर्वांना कवेत घेणारे तत्त्व आहे. इतिहासात युद्धापेक्षा अधिक माणसे धर्मामुळे मारली गेली. त्यामुळे धर्माचे अध्ययन करताना चांगल्या, वाईट दोन्ही गोष्टींचा विचार होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मनुष्यधर्म शिकविणारा सेक्युलॅरिझमचा हाच सर्वश्रेष्ठ विचार असल्याचे द्वादशीवार म्हणाले. अ‍ॅड सुहासिनी वंजारी यांनी प्रयत्नांनी माणूस किती मोठा होऊ शकतो याचे गोविंदराव वंजारी उत्तम उदाहण असून नव्या पिढीने त्यांचा आदर्श पुढे ठेवण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक अ‍ॅड अभिजित वंजारी यांनी केले. संचालन डॉ. निनाद काशीकर यांनी केले. आभार डॉ. अशोक कांबळे यांनी मानले.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर