शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

उद्योगासंदर्भात गेल्या अडीच वर्षात काय झालं? श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार - मुनगंटीवार

By कमलेश वानखेडे | Updated: October 31, 2022 15:48 IST

प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या मुद्यावरून हवा करणे सुरू

नागपूर : काही नेते पत्रकार परिषद घेत आहेत पण कोणतेही कागद दाखवत नाही, टाटा संदर्भात कोणतेही पत्र टाटा ने सरकारला दिले आहे का? एखाद्या जागेसाठी अर्ज केला नाही, पण अशा पद्धतीने हे सरकार उद्योगाच्या बाबतीत नाकारतामक भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. हे योग्य नाही. गेल्या अडीच वर्षात उद्योगासंदर्भात राज्यात काय झालं, या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण मंत्रीमंडळाच्या बैठकीत करणार आहोत, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मी स्वत: उद्योग सचिवांशी चर्चा केली आहे. यपूर्वीच्या उद्योग मंत्र्यांसोबत टाटा समुहाची एखादी बैठक झाली आहे का, त्या बैठकीचे मिनिट उपलब्ध नाहीत. मात्र, प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या मुद्यावरून हवा करणे सुरू केले आहे. राज्यातील तरुणांमध्ये भ्रम निर्माण करणे सुरू आहे. गेल्या अडीच वर्षात उद्योगांसाठी किती अर्ज आले. त्यावर काय निर्णय घेतले, प्रत्यक्षात किती उद्योग सुरू झाले, किती रोजगार मिळाले याबाबत श्वेत पत्रिका काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. राज्यात ७५ हजार पदे भरली जाणार आहेत. पोलीस विभागात २० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

कुणाचीही सुरक्षा काढण्याचे काम सरकार करीत नाही. या संदर्भात असलेली समिती आढावा घेते व त्यानंतर सचिव निर्णय घेतात. माझी सुरक्षा काढली होती, तेव्हाही मला असेच उत्तर दिले होते, असे त्यांनी सांगितले. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच सांगतील, असे सांगत त्यांनी बगल दिली.

साडेतीनशे पेक्षा जास्त वाघ 

- राज्यात साडेतीनशेपेक्षा जास्त वाघ आहेत. आपण अतिशय गंभीरपणे गेल्या चार वर्षातील आकडे घेतले आहेत. वन्यजीवांच्या हल्ल्यात मनुष्यांचे मृत्यू होत आहेत. या संदर्भात चांगली व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनुष्याचे जीवन अनमोल आहे. या संदर्भातील मदतीत वाढ होत आहे. ब्रम्हपुरीच्या जंगलात ५ वाघाचे रिलोकेशन केले जात आहे. एनटीसीएने मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राणा-कडू वाद मिटला

- आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते आहेत. जनतेची सेवा करणारे सरकार आहे. अशा प्रसंगी जनतेच्या प्रश्नासंबंधी चर्चा होण्याऐवजी वैयक्तिक आरोपांवर चर्चा होणे योग्य नाही. हा वाद मिटविण्यासाठी कडू व राणा यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. दोन्ही अनुभवी सदस्य राज्याच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारnagpurनागपूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी