शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगासंदर्भात गेल्या अडीच वर्षात काय झालं? श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार - मुनगंटीवार

By कमलेश वानखेडे | Updated: October 31, 2022 15:48 IST

प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या मुद्यावरून हवा करणे सुरू

नागपूर : काही नेते पत्रकार परिषद घेत आहेत पण कोणतेही कागद दाखवत नाही, टाटा संदर्भात कोणतेही पत्र टाटा ने सरकारला दिले आहे का? एखाद्या जागेसाठी अर्ज केला नाही, पण अशा पद्धतीने हे सरकार उद्योगाच्या बाबतीत नाकारतामक भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. हे योग्य नाही. गेल्या अडीच वर्षात उद्योगासंदर्भात राज्यात काय झालं, या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण मंत्रीमंडळाच्या बैठकीत करणार आहोत, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मी स्वत: उद्योग सचिवांशी चर्चा केली आहे. यपूर्वीच्या उद्योग मंत्र्यांसोबत टाटा समुहाची एखादी बैठक झाली आहे का, त्या बैठकीचे मिनिट उपलब्ध नाहीत. मात्र, प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या मुद्यावरून हवा करणे सुरू केले आहे. राज्यातील तरुणांमध्ये भ्रम निर्माण करणे सुरू आहे. गेल्या अडीच वर्षात उद्योगांसाठी किती अर्ज आले. त्यावर काय निर्णय घेतले, प्रत्यक्षात किती उद्योग सुरू झाले, किती रोजगार मिळाले याबाबत श्वेत पत्रिका काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. राज्यात ७५ हजार पदे भरली जाणार आहेत. पोलीस विभागात २० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

कुणाचीही सुरक्षा काढण्याचे काम सरकार करीत नाही. या संदर्भात असलेली समिती आढावा घेते व त्यानंतर सचिव निर्णय घेतात. माझी सुरक्षा काढली होती, तेव्हाही मला असेच उत्तर दिले होते, असे त्यांनी सांगितले. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच सांगतील, असे सांगत त्यांनी बगल दिली.

साडेतीनशे पेक्षा जास्त वाघ 

- राज्यात साडेतीनशेपेक्षा जास्त वाघ आहेत. आपण अतिशय गंभीरपणे गेल्या चार वर्षातील आकडे घेतले आहेत. वन्यजीवांच्या हल्ल्यात मनुष्यांचे मृत्यू होत आहेत. या संदर्भात चांगली व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनुष्याचे जीवन अनमोल आहे. या संदर्भातील मदतीत वाढ होत आहे. ब्रम्हपुरीच्या जंगलात ५ वाघाचे रिलोकेशन केले जात आहे. एनटीसीएने मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राणा-कडू वाद मिटला

- आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते आहेत. जनतेची सेवा करणारे सरकार आहे. अशा प्रसंगी जनतेच्या प्रश्नासंबंधी चर्चा होण्याऐवजी वैयक्तिक आरोपांवर चर्चा होणे योग्य नाही. हा वाद मिटविण्यासाठी कडू व राणा यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. दोन्ही अनुभवी सदस्य राज्याच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारnagpurनागपूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी