शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अचानक वाढली भाजीपाला व फळांची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 10:29 IST

बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे एक व्यवसाय बंद पडला, दुसरा स्वीकारलाताळेबंदीत बदलला मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात केली आहे.कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात १९ पासून आणि देशात २४ मार्चपासून टाळेबंद लागली असून, महिनाभरापासून अनेक उद्योग ठप्प पडले आहेत. लहान-मोठे व्यवसाय करून प्रपंच चालविणाऱ्यांची कामेही बंद झाली आहेत. कर्ज काढून व्यवसाय सुरू करणाऱ्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते भरण्यापासून ते कुटुंब चालविण्याच्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी दुसरा मार्ग स्वीकारला आहे. एक व्यवसाय बंद होताच दुसरा सुरू केला आहे. सरकारने या टाळेबंदीतून औषधालय, किराणा आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक गोष्टी वगळल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी भाजीपाला आणि फळे विक्रीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शहरात अचानक भाजीपाल्याची आणि फळांची दुकाने वाढली आहेत.मंगेश, उमेश व विनोद यांचाही ट्रॅव्हल्सचा व्यवसाय या टाळेबंदीत बंद पडला आहे. त्यांनी कर्ज काढून वाहने खरेदी केली होती. त्यामुळे कर्जाचा हप्ता फेडण्याची अडचण त्यांना येणार आहे. त्यांच्या घरातील ते एकटेच कमावणारे असल्याने कुटुंबाची चिंता लागून आहे. त्यामुळे मित्रांनी मिळून टरबूज विक्रीचा व्यवसाय सुरू केला. जवळची गुंतवणूक केल्याने रिस्क असून व्यवसाय बुडाला तर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्वांनी रिस्क घेऊन हा व्यापार सुरू केला. आर्थिक प्रश्न मिटला नसला तरी बऱ्याच अंशी कमी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या मित्रांप्रमाणे अनेकांनी दुसऱ्या व्यवसाय सुरू केला आहे. यातही सोपा मार्ग म्हणून फळे आणि भाजीपाला विक्रीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच की काय शहरात भाजी विक्री आणि फळे विक्रीची दुकाने वाढल्याचे दिसून येत आहे.हा प्रकार गंभीर पण...लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला गेला असताना अशाप्रकारे व्यवसाय सुरू करणे चिंतेचे कारण आहे. लोकांचा रोजगार गेल्याने पर्याय नसल्याने वेगळे मार्ग निवडले आहेत. मात्र अचानक भाजीची दुकाने वाढणे हा सुद्धा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस