शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

अचानक वाढली भाजीपाला व फळांची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 10:29 IST

बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे एक व्यवसाय बंद पडला, दुसरा स्वीकारलाताळेबंदीत बदलला मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात केली आहे.कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात १९ पासून आणि देशात २४ मार्चपासून टाळेबंद लागली असून, महिनाभरापासून अनेक उद्योग ठप्प पडले आहेत. लहान-मोठे व्यवसाय करून प्रपंच चालविणाऱ्यांची कामेही बंद झाली आहेत. कर्ज काढून व्यवसाय सुरू करणाऱ्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते भरण्यापासून ते कुटुंब चालविण्याच्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी दुसरा मार्ग स्वीकारला आहे. एक व्यवसाय बंद होताच दुसरा सुरू केला आहे. सरकारने या टाळेबंदीतून औषधालय, किराणा आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक गोष्टी वगळल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी भाजीपाला आणि फळे विक्रीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शहरात अचानक भाजीपाल्याची आणि फळांची दुकाने वाढली आहेत.मंगेश, उमेश व विनोद यांचाही ट्रॅव्हल्सचा व्यवसाय या टाळेबंदीत बंद पडला आहे. त्यांनी कर्ज काढून वाहने खरेदी केली होती. त्यामुळे कर्जाचा हप्ता फेडण्याची अडचण त्यांना येणार आहे. त्यांच्या घरातील ते एकटेच कमावणारे असल्याने कुटुंबाची चिंता लागून आहे. त्यामुळे मित्रांनी मिळून टरबूज विक्रीचा व्यवसाय सुरू केला. जवळची गुंतवणूक केल्याने रिस्क असून व्यवसाय बुडाला तर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्वांनी रिस्क घेऊन हा व्यापार सुरू केला. आर्थिक प्रश्न मिटला नसला तरी बऱ्याच अंशी कमी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या मित्रांप्रमाणे अनेकांनी दुसऱ्या व्यवसाय सुरू केला आहे. यातही सोपा मार्ग म्हणून फळे आणि भाजीपाला विक्रीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच की काय शहरात भाजी विक्री आणि फळे विक्रीची दुकाने वाढल्याचे दिसून येत आहे.हा प्रकार गंभीर पण...लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला गेला असताना अशाप्रकारे व्यवसाय सुरू करणे चिंतेचे कारण आहे. लोकांचा रोजगार गेल्याने पर्याय नसल्याने वेगळे मार्ग निवडले आहेत. मात्र अचानक भाजीची दुकाने वाढणे हा सुद्धा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस