शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

संघाचे यश फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 05:15 IST

दिलीप वेंगसरकर : फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता

ठळक मुद्देलोकमतसोबत विशेष बातचीत करताना वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या भविष्याबाबत चर्चा केली

नीलेश देशपांडेनागपूर : चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघाचे यश फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून राहील, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ‘कर्नल’ नावाने ओळखल्या जाणारे वेंगसरकर लॉर्ड्सवर १९८६ मध्ये शतकांच्या हॅटट्रिकसह विजयाचे शिल्पकार ठरले होते.

लोकमतसोबत विशेष बातचीत करताना वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या भविष्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये यशाचे रहस्य फलंदाजी ठरेल. जर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली तर त्यांना त्यांच्याच देशात आव्हान देता येईल.’ विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ पुनरागमन करू शकतो का, याबाबत बोलताना वेंगसरकर म्हणाले, ‘का नाही? कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या शानदार कामगिरीची पूर्ण आशा आहे. संघ समतोल असून मालिकेच्या वाटचालीसह कामगिरीत आणखी सुधारणा होऊ शकते.’

संघाच्या संयोजनाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘खेळपट्टीचे स्वरूप बघून किती फिरकीपटूंना संधी द्यायची, याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. पण, माझ्या अनुभवावरून असे वाटते की, इंग्लंडमध्ये या वातावरणात फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.’

n पुजाराच्या निराशाजनक कामगिरीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडूची आपली एक शैली असते. त्याचसोबत प्रत्येक खेळाडूला न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेगवेगळा अवधी लागतो. अनेकदा कुणी यशस्वी ठरतो. त्यामुळे केवळ पुजाराच नव्हे तर अन्य फलंदाजही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरू शकतात.‘

...त्यामुळे डब्ल्य   यूटीसी फायनलमध्ये पराभवn डब्ल्य  यूटीसी फायनलमधील पराभवासाठी वेंगसरकर यांनी सराव सामना न खेळायला मिळणे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. n ते म्हणाले, ‘इंग्लंडमधील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी सराव सामने खेळणे आवश्यक आहे. इंट्रा स्क्वाॅड लढतींना काही अर्थ नसतो.‘ 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघ