शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शासकीय निधीतून होणाऱ्या कामांचे व्हिडिओ सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:29 IST

अपूर्ण असलेली सर्व कामे येत्या १० ते १५ दिवसात पूर्ण होतील अशा बेताने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मौदा-कामठी उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : मौदा-कामठीत ११ हजारावर शेतकऱ्यांना ६७.७५ कोटीचे कर्जमाफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय निधी ज्या शासकीय संस्थांना वितरित केला जातो, त्या निधीतून होणाऱ्या सर्व कामाचे व्हिडिओ सादर करा तसेच नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करा. तूर्तास अपूर्ण असलेली सर्व कामे येत्या १० ते १५ दिवसात पूर्ण होतील अशा बेताने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मौदा-कामठी उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिले. मौदा व कामठी उपविभागात ११ हजारावर शेतकऱ्यांना आतापर्यंत ६७.७५ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ झाल्याचे पत्र पाठविण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.मौदा-कामठी उपविभागाची बैठक मौदा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आज झाली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, मौदा न.प.च्या अध्यक्ष भारती सोमनाथे, टेकचंद सावरकर, अनिल निधान, रमेश चिकटे, योगेश वाडीभस्मे, नरेश मोटघरे, सदानंद निमकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे यांनी एकेका विभागाचा आढावा घेऊन आतापर्यंत शासकीय योजनेच्या झालेल्या कामाची माहिती करून घेतली. यात नाला खोलीकरण, पालकमंत्री पांदण रस्ते, कृषी विभाग, कर्जमाफी योजना, पीक विमा, भूमिअभिलेख, पंतप्रधान आवास योजना, समाजकल्याण विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जि.प. बांधकाम, राज्य रस्ते, केंद्रीय मार्ग निधीतील रस्ते, आयुष्यमान योजना, उज्ज्वला गॅस योजना, अंत्योदय, अन्न योजना, महावितरणने केलेली कामे, सिंचन योजना, धडक सिंचन विहिरी अशा सर्व कामांची माहिती घेत आढावा घेण्यात आला. दलित वस्त्यांमधील कामांमध्ये कामाच्या दर्जाबाबत समझोता केला जाणार नाही. सर्व कामे ही ठरवून दिलेल्या निकषानुसारच असली पाहिजे, याकडेही पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.आतापर्यंत शासनाने दिलेल्या निधीतील ८० टक्के काम पूर्ण झाली असून उर्वरित २० टक्के कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. या उपविभागात आतापर्यंत ६८ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. सन २०१९-२० मध्ये पेंच लाभ क्षेत्राशिवाय मौदा तालुक्यात ४० व कामठी तालुक्यात ४० धडक सिंचन विहिरींचे काम आहे. राष्ट्रीय पेयजल योजना व अन्य पाणीपुरवठा योजनाअंतर्गत रनाळा येरखेडा आणि बिडगाव तरोडी या दोन योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. विविध योजनांद्वारे सिंचनाची कामे, जलयुक्त शिवार, नाला खोलीकरण, बंधारे, पाणीपुरवठा योजना यासाठी मोठ्या प्रमाणात निधी शासनाने या उपविभागाला उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेGovernmentसरकारfundsनिधी