शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुभाष देशमुख यांनी विदर्भाशी नाळ तुटू दिली नाही : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 20:03 IST

डॉ. सुभाष देशमुख हे गेल्या ४७ वर्षापासून अमेरिकेला राहतात. परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झाल्यावर लोक आपल्या माणसांना विसरतात. डॉ. देशमुख मात्र त्याला अपवाद ठरले. इतके वर्ष भारताबाहेर राहूनही त्यांनी नागपूर आणि विदर्भाशी नाळ तुटू दिली नाही. विदर्भाच्या मातीवर असलेले त्यांचे प्रेम अतुलनीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देदेशमुख यांचा अमृत महोत्सवी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. सुभाष देशमुख हे गेल्या ४७ वर्षापासून अमेरिकेला राहतात. परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झाल्यावर लोक आपल्या माणसांना विसरतात. डॉ. देशमुख मात्र त्याला अपवाद ठरले. इतके वर्ष भारताबाहेर राहूनही त्यांनी नागपूर आणि विदर्भाशी नाळ तुटू दिली नाही. विदर्भाच्या मातीवर असलेले त्यांचे प्रेम अतुलनीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. डॉ. सुभाष देशमुख मित्र परिवारातर्फे आयोजित डॉ. देशमुख अमृत महोत्सव समारंभात ते बोलत होते. धनवटे सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमात माजी मंत्री अनिल देशमुख, गिरीश गांधी, उद्योजक सत्यनारायण नुवाल, बाबुराव तिडके, श्रीराम काळे, नाना गावंडे, बाळासाहेब वानखेडे, नीलेश खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देउन डॉ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर