शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी तीन वर्षाचे शुल्क भरण्याची विद्यार्थ्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:10 IST

समाज कल्याण विभागाने फ्री-शीपचे फार्म मंजूर केले नसल्याचे कारण देत तीन वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. अन्यथा परीक्षेला बसू न देण्याची व टीसी रोखण्याची धमकी या विद्यार्थ्यांना दिली आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकीचे विद्यार्थी मानसिक दबावात : समाज कल्याण कार्यालयात आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : समाज कल्याण विभागाने फ्री-शीपचे फार्म मंजूर केले नसल्याचे कारण देत तीन वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. अन्यथा परीक्षेला बसू न देण्याची व टीसी रोखण्याची धमकी या विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामुळे प्रचंड मानसिक दबावात असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय पाटील, विश्वास पाटील, अ‍ॅड. स्मिता कांबळे, फुलझेले आदी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार २०१६-१७ या सत्रामध्ये कॅप राऊंडद्वारे अल्पसंख्यांक गटातील सीटवर अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, भटके विमुक्त विद्यार्थ्यांनी गुणवत्तेनुसार प्रवेश मिळविला. त्यानंतर शासनाच्या फ्री-शीप योजनेंतर्गत शुल्क प्रतिपूर्तीसाठी सर्व प्रमाणपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरला आणि नियमानुसार उर्वरित शुल्कही जमा केले. त्यानंतर शासनातर्फे विद्यार्थ्यांची फ्री-शीप प्रतिपूर्ती होणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. आता तीन वर्ष लोटल्यानंतर महाविद्यालयांकडून अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे धमकीपत्र प्राप्त झाले आहे. समाज कल्याण खात्याने फ्री-शीप मंजूर केली नसल्याने विद्यार्थ्यांना हे तिन्ही वर्षाचे शुल्क भरावे लागेल, अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही, असा इशारा या पत्रातून देण्यात आला. अशा प्रकारे संपूर्ण सत्राचे प्रत्येक विद्यार्थ्याला ४ लाख ११,२४० रुपये भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी दिले असल्याने विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. तीन वर्षे फ्री-शीपबाबत विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून अंतिम वर्षी अचानक अशाप्रकारे धक्कादायक इशारा देणे म्हणजे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्यासारखे असल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली. समाज कल्याण विभाग व महाविद्यालयाच्या चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर का, असा सवाल करीत विभागाने विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

टॅग्स :agitationआंदोलनStudentविद्यार्थी