शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

एकाच वेळी तीन वर्षाचे शुल्क भरण्याची विद्यार्थ्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:10 IST

समाज कल्याण विभागाने फ्री-शीपचे फार्म मंजूर केले नसल्याचे कारण देत तीन वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. अन्यथा परीक्षेला बसू न देण्याची व टीसी रोखण्याची धमकी या विद्यार्थ्यांना दिली आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकीचे विद्यार्थी मानसिक दबावात : समाज कल्याण कार्यालयात आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : समाज कल्याण विभागाने फ्री-शीपचे फार्म मंजूर केले नसल्याचे कारण देत तीन वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. अन्यथा परीक्षेला बसू न देण्याची व टीसी रोखण्याची धमकी या विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामुळे प्रचंड मानसिक दबावात असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय पाटील, विश्वास पाटील, अ‍ॅड. स्मिता कांबळे, फुलझेले आदी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार २०१६-१७ या सत्रामध्ये कॅप राऊंडद्वारे अल्पसंख्यांक गटातील सीटवर अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, भटके विमुक्त विद्यार्थ्यांनी गुणवत्तेनुसार प्रवेश मिळविला. त्यानंतर शासनाच्या फ्री-शीप योजनेंतर्गत शुल्क प्रतिपूर्तीसाठी सर्व प्रमाणपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरला आणि नियमानुसार उर्वरित शुल्कही जमा केले. त्यानंतर शासनातर्फे विद्यार्थ्यांची फ्री-शीप प्रतिपूर्ती होणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. आता तीन वर्ष लोटल्यानंतर महाविद्यालयांकडून अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे धमकीपत्र प्राप्त झाले आहे. समाज कल्याण खात्याने फ्री-शीप मंजूर केली नसल्याने विद्यार्थ्यांना हे तिन्ही वर्षाचे शुल्क भरावे लागेल, अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही, असा इशारा या पत्रातून देण्यात आला. अशा प्रकारे संपूर्ण सत्राचे प्रत्येक विद्यार्थ्याला ४ लाख ११,२४० रुपये भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी दिले असल्याने विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. तीन वर्षे फ्री-शीपबाबत विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून अंतिम वर्षी अचानक अशाप्रकारे धक्कादायक इशारा देणे म्हणजे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्यासारखे असल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली. समाज कल्याण विभाग व महाविद्यालयाच्या चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर का, असा सवाल करीत विभागाने विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

टॅग्स :agitationआंदोलनStudentविद्यार्थी