शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विद्यार्थ्यांनी सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी : परिणय फुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:06 IST

आदिवासी वसतिगृहात खानावळीतून मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आदिवासी मुलामुलींनी स्वत: वसतिगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी, असे आवाहन आदिवासी विकास,वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.

ठळक मुद्दे पारडी व हिवरीनगर येथील वसतिगृहांची केली पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आदिवासी वसतिगृहात खानावळीतून मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आदिवासी मुलामुलींनी स्वत: वसतिगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी, असे आवाहन आदिवासी विकास,वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.आदिवासी मुलांचे पारडी येथील शासकीय वसतिगृह तसेच हिवरीनगर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले. आदिवासी मुलांचे तसेच मुलींच्या शासकीय वसतिगृहातील खाद्यपदार्थांचा दर्जा हा सुमार असल्याबाबतच्या तक्रारी आदिवासी विभागाकडे येत होत्या. यासंदर्भात शासनाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) योजनेव्दारे खानावळीसाठी दर महिन्याला ३ हजार ५०० रुपये जमा होतात. या रकमेतून विद्यार्थी हव्या असलेल्या खानावळीतून डबा मागवतात. परंतू ज्यादा शुल्क अदा करुन देखील खाद्यपदार्थांची गुणवत्ता निकृष्ट राहते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन प्रायोगिक तत्त्वावर केवळ एक महिन्यासाठी सहकारी खानावळ चालवावी. यामध्ये गृहप्रमुख, गृहपाल यांच्या देखरेखीखाली आदिवासी वसतिगृहामध्ये खानावळ चालविण्यासाठी इच्छूक उमेदवारांसाठी जाहिरात काढण्यात यावी. या अंतर्गत खानावळीत स्वच्छता आणि दर्जा कायम राखून विद्यार्थ्यांना योग्य आहार पुरविणाऱ्या खानावळी चालकाची नेमणूक करावी. अन्न पदार्थ गृहप्रमुख, गृहपाल तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीमध्ये वसतिगृहाच्या स्वयंपाक घरामध्ये बनविण्यात येतील. या योगे विद्यार्थ्यांना ताजे आणि उत्तम खाद्यपदार्थ वेळेवर उपलब्ध होतील, असेही फुके यांनी सांगितले.इंटरनेट सुविधा मिळणार विद्यार्थिर्नींनी ग्रंथालयामध्ये असणाºया संगणकांसाठी इंटरनेटच्या सुविधेची मागणी केली. विद्यार्थिनींची ही मागणी पूर्ण करण्यासंदर्भात डॉ. फुके यांनी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल शीतल मानकर यांना सूचना दिल्यात.प्रवेश प्रक्रीया सुरु आदिवासी मुलांच्या वसतीगृहामध्ये एक हजार विद्यार्थ्यांची क्षमता असून सध्यस्थितीला नवीन ८१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थी वसतीगृहात राहत आहेत. आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये १०० विद्यार्थिनींची क्षमता असून सध्यस्थितीला ३६ विद्यार्थिनी वसतीगृहात राहत असून नवीन विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु आहे.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेStudentविद्यार्थी