शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

यंदा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 10:47 IST

इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी शेष फंडातून २० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली़ गरजेनुसार तो अधिक वाढविण्यात येईल़

ठळक मुद्देशेष फंडातून २० लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारिद्र्यरेषेखालील, एससी, एसटी आणि सर्व मुलींना दरवर्षी शासनाच्या वतीने गणवेश देण्यात येतो़ परंतु, नॉन बीपीएल, ओबीसी संवर्गातील विद्यार्थी या गणवेशापासून वंचित राहायचे़ ही बाब विद्यार्थ्यांच्या मनात दुजाभाव करणारी आहे़ हे कारण पुढे करीत शिक्षण विभागाने २० लाखांचा निधी देऊन ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे़पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळेल़ त्यानंतर निधीमध्ये वाढ करण्यात येईल़ प्रती गणवेशावर ६०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे़ या संवर्गात २० हजार विद्यार्थी आहे़ यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही गणवेशाचा विषय मांडण्यात आला होता़ याबाबत स्वत: जिल्हा परिषदेचे वित्त व शिक्षण समिती सभापती उकेश चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता़शासनाच्या सर्वशिक्षा अभियान योजनेअंतर्गत अशा शाळेत शिकणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील व आरक्षित प्रवर्गातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना व सर्व मुलींनाच गणवेश देण्यात येतात. खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येत नाही. त्यांना स्वखर्चाने गणवेशाची रक्कम जुळवावी लागायची़ त्यामुळे मागील सत्रात जिल्हा परिषद शाळांतील शेकडो विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत यायचे़ यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीस गणवेशाचे अनुदान वितरित करण्यात यायचे़ त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून गणवेश खरेदी, शिलाई करणे अपेक्षित होते. त्यात खुल्या-ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही मुख्याध्यापक आपल्या स्तरावरून गणवेशाची जुळवाजुळव करून देत होते. मात्र, मागील सत्रापासून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) लागू झाली़ आता ओबीसी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार असल्याने त्यांना वंचित राहावे लागणार नाही़

इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी शेष फंडातून २० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली़ गरजेनुसार तो अधिक वाढविण्यात येईल़- उकेश चव्हाण, वित्त व शिक्षण सभापती, जि.प.जि.प.च्या सर्व शाळांना एकच गणवेशजिल्हा परिषदे अंतर्गत १५०० च्यावर शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांचा समान गणवेश असावा याबाबत शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. गणवेशाची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आली आहे. त्यामुळे गणवेश कुठून ही खरेदी करावा पण तो सर्व शाळांना एकच असावा, असे निर्देश सभापती चव्हाण यांनी दिले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी