शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतदानासाठी विद्यार्थी करणार पालकांना प्रेरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:09 IST

मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना प्रेरित करावे, यादृष्टीने निवडणूक आयोगामार्फत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे.

ठळक मुद्देमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रम : विद्यार्थी भरणार संकल्प पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना प्रेरित करावे, यादृष्टीने निवडणूक आयोगामार्फत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे.लोकशाहीत मतदान हे महत्त्वाचे आहे. मतदानाच्या बाबतीतदेखील लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपली लोकशाही अधिक सक्षम होणार नाही. लोकशाहीच्या मजबुती करण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अ‍ॅन्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन’(स्विप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहर-ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेत, त्यांना पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.राज्यात सध्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये राज्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही सरासरीपेक्षा खालावत चालली असल्याचे चित्र आहे. ही मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावावा. यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पालक मतदान करतील. असे संकल्पपत्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याअंतर्गत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांकडून त्यांचे पालक आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील असे संकल्पपत्र भरून घेतील. शहर-जिल्ह्यात सरकारी व खासगी माध्यमांच्या सुमारे तीन हजारांवर शाळा असून, येथे अडीच लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांकडून हे संकल्पपत्र भरून घेत, त्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. व्हीपसाठी ग्रामीण भागात नोडल अधिकारी म्हणून जि.प.च्या पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ राजेंद्र भुयार यांची नेमणूक केली आहे. तर शहरी भागासाठी मनपाच्या उपायुक्त रंजना लाडे यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील आठवडाभरात शाळांना विद्यार्थ्यांकडून हे संकल्पपत्र भरून घेत सदरचा अहवाल शिक्षण विभागाच्या माध्यमातून नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे.असे आहे संकल्प पत्रया संकल्पपत्रात विद्यार्थ्याला आपले नाव, वर्ग, शाळा लिहायची आहे. याद्वारे ‘संकल्प करतो की, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये माझे पालकांना मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याकरिता प्रवृत्त करील तसेच माझे परिसरातील अन्य व्यक्तींनादेखील मतदान करण्याकरिता प्रवृत्त करीन, असा संकल्प करीत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीVotingमतदान