शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

राज्यभरातील शालेय विद्यार्थी खिचडीच्या जागी खाताहेत नुसताच पांढरा भात ; पुरवठादाराने बंद केला पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 19:52 IST

शालेय पोषण आहार पुरवठादाराचे कंत्राट संपल्याने शाळांना धान्यादी मालाचा पुरवठा बंद झाला आहे. सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पांढऱ्या भातावरच पोषण सुरू आहे. ही परिस्थिती केवळ नागपूर जिल्ह्याची नाही, तर राज्यभरात पोषण आहाराची अशीच अवस्था आहे.

ठळक मुद्देपोषण आहाराचा तिढा सुटणार कधी?

आॅनलाईन लोकमतनागपूर : शालेय पोषण आहार पुरवठादाराचे कंत्राट संपल्याने शाळांना धान्यादी मालाचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ही जबाबदारी शिक्षकांवर ढकलली. मात्र शिक्षकांनी या जबाबदारीतून हात काढल्याने सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पांढऱ्या भातावरच पोषण सुरू आहे. ही परिस्थिती केवळ नागपूर जिल्ह्याची नाही, तर राज्यभरात पोषण आहाराची अशीच अवस्था आहे.पोषण आहाराच्या रूपात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी दिली जात होती. यासाठी लागणारे साहित्य महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन लिमिटेड या पुरवठादारामार्फत पुरविण्यात येत होते. शासनाने या पुरवठादार कंपनीशी करार केला होता. हा करार जून २०१६ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर कंपनीला एक महिन्याची वाढ देण्यात आली. दरम्यान एक महिन्यात शासनाने पुरवठादारासंदर्भात कुठलीही प्रक्रिया न केल्याने आॅगस्टपासून पुरवठादाराने खिचडीसाठी लागणारा धान्यादी मालाचा पुरवठा बंद केला. धान्यादी मालात मटकी, तूरडाळ, वाटाणा, मसाले, तेल, मीठ, तिखट आदींचा समावेश आहे. हे साहित्य आॅगस्ट महिन्यापासून शाळांना पुरवठा झालेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना खिचडी शिजविण्याबरोबरच धान्यादी मालाच्या खरेदीचीही जबाबदारी दिली होती.शासनाने पुरवठादाराशी केलेल्या समन्वयातून शाळांना केवळ तांदळाचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र धान्यादी माल हा मुख्याध्यापकाने खरेदी करावा, अशा सूचना शिक्षण विभागाच्या होत्या. इंधन व भाजीपाल्याबरोबरच मुख्याध्यापकांना धान्यादी मालही खरेदी करायचा होता. मुख्याध्यापकांनी महिनाभर हा खर्च केला, परंतु विभागाकडून त्याकरिता निधी वेळेवर उपलब्ध झाला नाही. पोषण आहाराच्या खर्चाचा भुर्दंड वाढल्याने मुख्याध्यापकांनी धान्यादी मालाच्या खरेदीला विरोध केला. याविरोधात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनानी एकत्र येऊन नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलन उभारले व ३ आॅक्टोबरपासून धान्यादी मालाची खरेदी न करता उपलब्ध धान्य शिजवून देण्याचे ठरवण्यात आले. शिक्षण विभागाने तडजोड करून आॅगस्ट आणि सप्टेंबरचा खर्च दिला. परंतु आॅक्टोबरपासून पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे. अनेक शाळांमध्ये धान्यादी मालाची खरेदी करण्यात आली नसल्याने पांढरा भातच विद्यार्थ्यांना दिला जात आहे.शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु पाच महिने लोटूनही शासनाने ते गांभीर्याने घेतले नाही. परिणामी आज गरीब विद्यार्थ्यांना पांढरा भात खाण्याशिवाय पर्याय नाही.लीलाधार ठाकरे, अध्यक्ष, नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समिती

टॅग्स :educationशैक्षणिक