शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

चक्क नागपुरातील एका ‘क्वारंटाईन’ केंद्रात शिरले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 22:12 IST

‘कोरोना’शी सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहातील ‘क्वारंटाईन’ केंद्रात चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कागदपत्रे घेण्यासाठी प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : कागदपत्रे नेण्यासाठी गेले आत, संसर्ग झाल्यास जबाबदार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’शी सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहातील ‘क्वारंटाईन’ केंद्रात चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कागदपत्रे घेण्यासाठी प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जोखमीचे क्षेत्र असताना एकाने नावापुरती ‘पीपीई किट’ घातली होती तर दुसरा विद्यार्थी केवळ तोंडाला रुमाल लावून आला होता. या प्रकाराचे ‘व्हिडीयो’देखील ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाले आहेत. या विद्यार्थ्यांना आत जाण्याची परवानगी दिलीच कुणी असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांनादेखील ‘क्वारंटाईन’ करण्याची मागणी समोर येत आहे.‘लॉकडाऊन’ जारी होण्याअगोदरच नागपूर विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्यास सांगितले होते. या विद्यार्थ्यांचे सर्व सामान ‘वॉर्डन’ डॉ.श्याम कोरेटी यांच्या देखरेखीत काही खोल्यात स्थानांतरित करुन पद्धतशीरपणे त्यांची मांडणीदेखील करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शासकीय यंत्रणेकडून तेथे ‘क्वारंटाईन’ केंद्र उभारण्यात आले. सद्यस्थितीतदेखील या इमारतीमध्ये संशयितांना ठेवण्यात आले आहे.काही विद्यार्थ्यांना कागदपत्र व साहित्याची तातडीने आवश्यकता असल्याची मागणी सिनेट सदस्य प्रशांत डेकाटे व मानवाधिकार संघटनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने शासकीय यंत्रणेकडून परवानगी मिळेल असे सांगितले. त्यानंतर मनपा उपायुक्त राम जोशी यांच्याकडे ते गेले व जोशी यांनी तीन विद्यार्थ्यांना कागदपत्रे नेण्याची परवानगी दिली. परंतु असे करत असताना सुरक्षा संचाचा वापर करण्याची अट ठेवली.तोंडाला रुमाल बांधून प्रवेश‘क्वारंटाईन’ केंद्रातील अधिकाऱ्यांकडे ‘पीपीई किट्स’ ची कमतरता होती. त्यामुळे एकाच विद्यार्थ्याला ‘किट’ देण्यात आली. परंतु त्याने ती ‘किट’ अयोग्य पद्धतीने घातली होती. हातात तर ‘ग्लोव्हज’ऐवजी चक्क पॉलिथीन होते. त्याच्यासोबत गेलेल्या दुसºया विद्यार्थ्याने तर केवळ तोंडाला रुमाल बांधला होता. आत गेल्यावर त्यांनी सामानांना हात लावून आवश्यक ती कागदपत्रे काढली व ते परतले. मात्र अतिशय जोखमीचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी ‘पीपीई किट’ शिवाय परवानगी मिळालीच कशी व सुरक्षारक्षकांनी त्यांना सोडलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.जीवापेक्षा कागदपत्रे महत्त्वाची का ?संबंधित क्षेत्र जोखमीचे आहे याची माहिती असतानादेखील ‘सिनेट’ सदस्यांनी वारंवार प्रशासनाकडे विद्यार्थ्यांची मागणी लावून धरली होती. प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थ्यांना खरोखरच मुलाखतीचा ‘कॉल’ आला आहे का याची चाचपणीदेखील प्रशासनाने केली नाही. या वर्तनावर व्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश शेराम यांनी नाराजी व्यक्त केली. जीवापेक्षा कागदपत्र महत्त्वाचे नाहीत. हा स्वत:सोबत समाजाचे आरोग्य धोक्यात टाकण्याचा प्रकार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने ‘क्वारंटाईन’ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.परवानगी कशी दिली ?संंबंधित सदस्य आमच्याकडे अर्ज घेऊन आले होते. परंतु संंबंधित इमारतीचा ताबा सरकारी यंत्रणेकडे आहे. त्यामुळे त्यांचीच परवानगी लागेल, असे आम्ही स्पष्ट केल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना सुरक्षा संच घालूनच प्रवेश देण्याची सूचना दिली होती. जर कुणी नियमांचा भंग केला असेल तर त्यांना ‘क्वारंटाईन’ करण्यावर विचार करावा लागेल, असे राम जोशी यांनी सांगितले. दरम्यान, अशा क्षेत्रात जाण्याची त्यांना परवानगी मिळालीच कशी हा प्रश्न कायम आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ