शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

चक्क नागपुरातील एका ‘क्वारंटाईन’ केंद्रात शिरले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 22:12 IST

‘कोरोना’शी सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहातील ‘क्वारंटाईन’ केंद्रात चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कागदपत्रे घेण्यासाठी प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : कागदपत्रे नेण्यासाठी गेले आत, संसर्ग झाल्यास जबाबदार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’शी सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहातील ‘क्वारंटाईन’ केंद्रात चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कागदपत्रे घेण्यासाठी प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जोखमीचे क्षेत्र असताना एकाने नावापुरती ‘पीपीई किट’ घातली होती तर दुसरा विद्यार्थी केवळ तोंडाला रुमाल लावून आला होता. या प्रकाराचे ‘व्हिडीयो’देखील ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाले आहेत. या विद्यार्थ्यांना आत जाण्याची परवानगी दिलीच कुणी असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांनादेखील ‘क्वारंटाईन’ करण्याची मागणी समोर येत आहे.‘लॉकडाऊन’ जारी होण्याअगोदरच नागपूर विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्यास सांगितले होते. या विद्यार्थ्यांचे सर्व सामान ‘वॉर्डन’ डॉ.श्याम कोरेटी यांच्या देखरेखीत काही खोल्यात स्थानांतरित करुन पद्धतशीरपणे त्यांची मांडणीदेखील करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शासकीय यंत्रणेकडून तेथे ‘क्वारंटाईन’ केंद्र उभारण्यात आले. सद्यस्थितीतदेखील या इमारतीमध्ये संशयितांना ठेवण्यात आले आहे.काही विद्यार्थ्यांना कागदपत्र व साहित्याची तातडीने आवश्यकता असल्याची मागणी सिनेट सदस्य प्रशांत डेकाटे व मानवाधिकार संघटनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने शासकीय यंत्रणेकडून परवानगी मिळेल असे सांगितले. त्यानंतर मनपा उपायुक्त राम जोशी यांच्याकडे ते गेले व जोशी यांनी तीन विद्यार्थ्यांना कागदपत्रे नेण्याची परवानगी दिली. परंतु असे करत असताना सुरक्षा संचाचा वापर करण्याची अट ठेवली.तोंडाला रुमाल बांधून प्रवेश‘क्वारंटाईन’ केंद्रातील अधिकाऱ्यांकडे ‘पीपीई किट्स’ ची कमतरता होती. त्यामुळे एकाच विद्यार्थ्याला ‘किट’ देण्यात आली. परंतु त्याने ती ‘किट’ अयोग्य पद्धतीने घातली होती. हातात तर ‘ग्लोव्हज’ऐवजी चक्क पॉलिथीन होते. त्याच्यासोबत गेलेल्या दुसºया विद्यार्थ्याने तर केवळ तोंडाला रुमाल बांधला होता. आत गेल्यावर त्यांनी सामानांना हात लावून आवश्यक ती कागदपत्रे काढली व ते परतले. मात्र अतिशय जोखमीचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी ‘पीपीई किट’ शिवाय परवानगी मिळालीच कशी व सुरक्षारक्षकांनी त्यांना सोडलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.जीवापेक्षा कागदपत्रे महत्त्वाची का ?संबंधित क्षेत्र जोखमीचे आहे याची माहिती असतानादेखील ‘सिनेट’ सदस्यांनी वारंवार प्रशासनाकडे विद्यार्थ्यांची मागणी लावून धरली होती. प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थ्यांना खरोखरच मुलाखतीचा ‘कॉल’ आला आहे का याची चाचपणीदेखील प्रशासनाने केली नाही. या वर्तनावर व्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश शेराम यांनी नाराजी व्यक्त केली. जीवापेक्षा कागदपत्र महत्त्वाचे नाहीत. हा स्वत:सोबत समाजाचे आरोग्य धोक्यात टाकण्याचा प्रकार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने ‘क्वारंटाईन’ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.परवानगी कशी दिली ?संंबंधित सदस्य आमच्याकडे अर्ज घेऊन आले होते. परंतु संंबंधित इमारतीचा ताबा सरकारी यंत्रणेकडे आहे. त्यामुळे त्यांचीच परवानगी लागेल, असे आम्ही स्पष्ट केल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना सुरक्षा संच घालूनच प्रवेश देण्याची सूचना दिली होती. जर कुणी नियमांचा भंग केला असेल तर त्यांना ‘क्वारंटाईन’ करण्यावर विचार करावा लागेल, असे राम जोशी यांनी सांगितले. दरम्यान, अशा क्षेत्रात जाण्याची त्यांना परवानगी मिळालीच कशी हा प्रश्न कायम आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ