शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

विद्यार्थ्यांनो, बाबासाहेबांचे आदर्श अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबासाहेबांचा शाळा प्रवेश ही मोठी क्रांतिकारक घटना होती. ते महान विद्वान होते परंतु त्यापेक्षा ते शीलवान आणि आदर्श विद्यार्थी होते. जातीयवादाचे चटके सहन करीत वर्गाबाहेर शिकूनही त्यांनी या देशाचा उद्धारच केला. आज विद्यार्थ्यांना थोडासा अभ्यास करताना चहा किंवा कोणत्याही व्यसनाची गरज भासते. बाबासाहेबांना १८ तास अभ्यास ...

ठळक मुद्देमिलिंद माने : समाज कल्याण विभागात विद्यार्थी दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबासाहेबांचा शाळा प्रवेश ही मोठी क्रांतिकारक घटना होती. ते महान विद्वान होते परंतु त्यापेक्षा ते शीलवान आणि आदर्श विद्यार्थी होते. जातीयवादाचे चटके सहन करीत वर्गाबाहेर शिकूनही त्यांनी या देशाचा उद्धारच केला. आज विद्यार्थ्यांना थोडासा अभ्यास करताना चहा किंवा कोणत्याही व्यसनाची गरज भासते. बाबासाहेबांना १८ तास अभ्यास करूनही कधी या व्यसनाची गरज भासली नाही. कारण त्यांनी जीवनाचे ध्येय ठरविले होते. विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श अंगिकारले पाहीजे, असे आवाहन आमदार डॉ. मिलिंद माने यांनी केले.समाज कल्याण विभाग, नागपूर मुख्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे संचालक संजय मीना, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजय वाकुलकर, जिल्हा जाती पडताळणी समितीचे उपायुक्त आर.डी. आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीमुळे उच्चवर्णीय लोक बाबासाहेबांचा द्वेष करतात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आरक्षण, शिष्यवृत्तीमुळे प्रगती झाली असे गृहीत धरले जाते. हे अर्धवट सत्य आहे. मागासवर्गीयांची आरक्षणामुळे नाही तर बाबासाहेबांच्या आदर्शामुळे प्रगती झाली आहे. संधी मिळत असली तरी प्रत्येकाला आपली क्षमता सिद्ध करावीच लागते. बाबासाहेबांचे हे महात्म्य सर्व समाजाला समजले पाहीजे.विद्यार्थी दिनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थी निबंध, वक्तृत्व स्पर्धेत बाबासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास करतील. आज महाराष्टÑात हा दिवस साजरा होत आहे. भविष्यात देशभरात आणि जगभरात हा आदर्श दिवस साजरा होईल असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला.यावेळी संजय मीना, आर.डी. आत्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रास्ताविकातून विभागाच्या सर्व वसतिगृहात, शाळांमध्ये हा दिवस साजरा होत असल्याचे सांगितले. आर्थिक कारणामुळे पुढे जाऊ शकत नसलेल्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रवेशद्वार मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. समता प्रतिष्ठानचे लेखाधिकारी शिलसागर चहांदे यांनी आभार मानले.