शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

शौचालय वापराच्या जनजागृतीत आता विद्यार्थ्यांचाही सहभाग

By admin | Updated: June 4, 2017 17:26 IST

हागणदारीमुक्तीसाठी ग्राम पंचायतींमार्फत गठित केलेल्या गुड मॉर्निंग पथकात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे.

दिगांबर जवादे । गडचिरोली : हागणदारीमुक्तीसाठी ग्राम पंचायतींमार्फत गठित केलेल्या गुड मॉर्निंग पथकात जिल्हा परिषद शाळेतील सातवी व आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. याची अंमलबजावणी शाळेच्या पहिल्या दिवसापासून करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने नियोजन सुरू केले आहे. स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करायची असेल तर गावे हागणदारीमुक्त होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये व शहरी भागातील नागरिकांना १७ हजार रूपये अनुदान दिले जात आहे. अनेकांनी शौचालये बांधली आहेत, मात्र या शौचालयांचा वापरच केला जात नसल्याचे सत्य पुढे आले आहे. ग्रामीण भागातील ९५ टक्के नागरिकांकडे शौचालय आहे. तरीही गावातील नागरिक शौचास बाहेर जात असल्याचे चित्र आहे. शौचालयाचे बांधकाम व त्याचा वापर करण्याविषयी आजपर्यंत शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही. स्वच्छतेच्या या अभियानात विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविल्यास कदाचित सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा सल्ला काही तज्ज्ञांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांना दिला. या उपक्रमाला प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एम. एन. चलाख हिरवी झेंडी दाखविली. त्यानुसार पुढील शैक्षणिक सत्रापासून हागणदारी मुक्तीच्या जनजागृतीविषयक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. गावात जे गुड मॉर्निंग पथक तयार केले जाणार आहे, त्या पथकामध्ये जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले जाणार आहे. या कामासाठी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, युवक, स्वयंसेवी संस्था यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. पुढील आठ दिवसांत पटनोंदणी पंधरवडा राबविला जाणार आहे. पटनोंदणी पंधारवडादरम्यानच प्रभातफेरी काढून शौचालय वापराची जनजागृती केली जाणार आहे. शौचालय वापराचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाणार आहेत. त्यानंतर सदर विद्यार्थी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शौचालय वापराचे महत्त्व पटवून देणार आहेत. गडचिरोली जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने राबविलेला राज्यातील हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून राज्याला व देशाला सदर प्रयोग मार्गदर्शक ठरावा, यासाठी जिल्हा परिषद व शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी उघड केले वास्तवविद्यार्थ्याच्या घरातील शौचालयाचा वापर होतो किंवा नाही, हे सत्य विद्यार्थ्यांकडूनच कळावे, यासाठी जिल्हा परिषदेने जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद शाळेतील प्रतिविद्यार्थी एक याप्रमाणे १० हजार विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड दिले होते. या पोस्टकार्डमध्ये माहिती भरून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले आहे. पोस्टकार्डमध्ये लिहिलेली माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. ग्रामीण भागातील कुटुंब शौचालयाचा वापर करीत नाही, शौचालयाच्या इमारतीचा वापर सरपण ठेवण्यासाठी केला जातो, तर काही कुटुंब शौचालयाचा वापर स्नानगृह म्हणून करीत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील हागणदारीमुक्तीचे वास्तव पुढे आले आहे.