शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय वापराच्या जनजागृतीत आता विद्यार्थ्यांचाही सहभाग

By admin | Updated: June 4, 2017 17:26 IST

हागणदारीमुक्तीसाठी ग्राम पंचायतींमार्फत गठित केलेल्या गुड मॉर्निंग पथकात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे.

दिगांबर जवादे । गडचिरोली : हागणदारीमुक्तीसाठी ग्राम पंचायतींमार्फत गठित केलेल्या गुड मॉर्निंग पथकात जिल्हा परिषद शाळेतील सातवी व आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. याची अंमलबजावणी शाळेच्या पहिल्या दिवसापासून करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने नियोजन सुरू केले आहे. स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करायची असेल तर गावे हागणदारीमुक्त होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये व शहरी भागातील नागरिकांना १७ हजार रूपये अनुदान दिले जात आहे. अनेकांनी शौचालये बांधली आहेत, मात्र या शौचालयांचा वापरच केला जात नसल्याचे सत्य पुढे आले आहे. ग्रामीण भागातील ९५ टक्के नागरिकांकडे शौचालय आहे. तरीही गावातील नागरिक शौचास बाहेर जात असल्याचे चित्र आहे. शौचालयाचे बांधकाम व त्याचा वापर करण्याविषयी आजपर्यंत शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही. स्वच्छतेच्या या अभियानात विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविल्यास कदाचित सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा सल्ला काही तज्ज्ञांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांना दिला. या उपक्रमाला प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एम. एन. चलाख हिरवी झेंडी दाखविली. त्यानुसार पुढील शैक्षणिक सत्रापासून हागणदारी मुक्तीच्या जनजागृतीविषयक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. गावात जे गुड मॉर्निंग पथक तयार केले जाणार आहे, त्या पथकामध्ये जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले जाणार आहे. या कामासाठी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, युवक, स्वयंसेवी संस्था यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. पुढील आठ दिवसांत पटनोंदणी पंधरवडा राबविला जाणार आहे. पटनोंदणी पंधारवडादरम्यानच प्रभातफेरी काढून शौचालय वापराची जनजागृती केली जाणार आहे. शौचालय वापराचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाणार आहेत. त्यानंतर सदर विद्यार्थी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शौचालय वापराचे महत्त्व पटवून देणार आहेत. गडचिरोली जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने राबविलेला राज्यातील हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून राज्याला व देशाला सदर प्रयोग मार्गदर्शक ठरावा, यासाठी जिल्हा परिषद व शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी उघड केले वास्तवविद्यार्थ्याच्या घरातील शौचालयाचा वापर होतो किंवा नाही, हे सत्य विद्यार्थ्यांकडूनच कळावे, यासाठी जिल्हा परिषदेने जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद शाळेतील प्रतिविद्यार्थी एक याप्रमाणे १० हजार विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड दिले होते. या पोस्टकार्डमध्ये माहिती भरून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले आहे. पोस्टकार्डमध्ये लिहिलेली माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. ग्रामीण भागातील कुटुंब शौचालयाचा वापर करीत नाही, शौचालयाच्या इमारतीचा वापर सरपण ठेवण्यासाठी केला जातो, तर काही कुटुंब शौचालयाचा वापर स्नानगृह म्हणून करीत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील हागणदारीमुक्तीचे वास्तव पुढे आले आहे.