शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा संघर्ष पेटणार

By admin | Updated: March 27, 2015 01:57 IST

महापालिकेच्या उदासिनतेमुळे गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा प्रश्न आणखी पेटणार आहे.

नागपूर : महापालिकेच्या उदासिनतेमुळे गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा प्रश्न आणखी पेटणार आहे. या स्मारकासाठी मागील २२ वर्षांपासून विविध आंबेडकरी संघटना संघर्ष करीत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या स्मारक संघर्ष समितीने येत्या १४ एप्रिलपर्यंत स्मारकाचा मुद्दा न सुटल्यास जागा ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. त्यावर समिती ठाम असून १४ एप्रिलला स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.धंतोली येथील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याची घोषणा महापालिकेने २२ वर्षांपूर्वी केली होती. त्यानंतर दरवर्षी महापलिकेच्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी निधीची तरतूदसुद्धा केली जात होती, परंतु स्मारकाचे काम मात्र सुरू झाले नाही. सध्या महापालिकेच्या जागेच्या लीजच्या नूतनीकरणाचा प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. असे असले तरी आतापर्यंत अनेकदा आंबेडकरी जनतेने स्मारकाच्या निर्मितीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलने केली, मात्र महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे आंबेडकरी संघटनांमध्ये तीव्र असंतोष आहे. महापालिकेच्या जागेवर ज्याप्रमाणे श्रमिक पत्रकार भवन, शासकीय ग्रंथालय, यशवंत स्टेडियमवरील दुकाने, स्टार बस इत्यादीसाठीची जागा उपलब्ध आहे तर स्मारकासाठीच जागा उपलब्ध का करून दिली जात नाही, असा प्रश्न आंबेडकरी जनतेद्वारा विचारला जात आहे. तसेच या प्रश्नावर आंबेडकरी नेते गप्प असल्याबद्दलसुद्धा आंबेडकरी जनतेमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. यासंदर्भात डॉ. बाबसाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक संघर्ष समितीचे दिनेश अंडरसहारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जन्मशताब्दी स्मारकासाठी आजवर सनदशीर मार्गानेच लढा देत आहोत. महापौर, मुख्यमंत्री सर्वांनाच भेटून झाले. आंबेडकरी जनता ही कायद्यानुसार चालणारी आहे. आजवर आम्ही कायद्यानुसारच मागणी रेटून धरली. १४ तारखेलासुद्धा आम्ही सनदशीर मार्गानेच आंदोलन करणार आहोत. त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे यांनीसुद्धा हा विषय लावून धरला आहे. यासंबंधात ते म्हणाले की, भाजपातर्फे राज्यात सत्ता आल्यास आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले जात होते. आता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही भाजपचीच सत्ता आहे. तेव्हा हा प्रश्न सोडविण्यात कुठली अडचण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत नागपूरचे असून त्यांना या विषयाची चांगली जाण आहे. तेव्हा त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लीजचा प्रश्न राज्य शसनाकडे प्रलंबित असल्याने आंबेडकरी जनतेच्यावतीने पुन्हा एकदा संयुक्त शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन विनंती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)