शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा संघर्ष पेटणार

By admin | Updated: March 27, 2015 01:57 IST

महापालिकेच्या उदासिनतेमुळे गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा प्रश्न आणखी पेटणार आहे.

नागपूर : महापालिकेच्या उदासिनतेमुळे गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा प्रश्न आणखी पेटणार आहे. या स्मारकासाठी मागील २२ वर्षांपासून विविध आंबेडकरी संघटना संघर्ष करीत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या स्मारक संघर्ष समितीने येत्या १४ एप्रिलपर्यंत स्मारकाचा मुद्दा न सुटल्यास जागा ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. त्यावर समिती ठाम असून १४ एप्रिलला स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.धंतोली येथील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याची घोषणा महापालिकेने २२ वर्षांपूर्वी केली होती. त्यानंतर दरवर्षी महापलिकेच्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी निधीची तरतूदसुद्धा केली जात होती, परंतु स्मारकाचे काम मात्र सुरू झाले नाही. सध्या महापालिकेच्या जागेच्या लीजच्या नूतनीकरणाचा प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. असे असले तरी आतापर्यंत अनेकदा आंबेडकरी जनतेने स्मारकाच्या निर्मितीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलने केली, मात्र महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे आंबेडकरी संघटनांमध्ये तीव्र असंतोष आहे. महापालिकेच्या जागेवर ज्याप्रमाणे श्रमिक पत्रकार भवन, शासकीय ग्रंथालय, यशवंत स्टेडियमवरील दुकाने, स्टार बस इत्यादीसाठीची जागा उपलब्ध आहे तर स्मारकासाठीच जागा उपलब्ध का करून दिली जात नाही, असा प्रश्न आंबेडकरी जनतेद्वारा विचारला जात आहे. तसेच या प्रश्नावर आंबेडकरी नेते गप्प असल्याबद्दलसुद्धा आंबेडकरी जनतेमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. यासंदर्भात डॉ. बाबसाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक संघर्ष समितीचे दिनेश अंडरसहारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जन्मशताब्दी स्मारकासाठी आजवर सनदशीर मार्गानेच लढा देत आहोत. महापौर, मुख्यमंत्री सर्वांनाच भेटून झाले. आंबेडकरी जनता ही कायद्यानुसार चालणारी आहे. आजवर आम्ही कायद्यानुसारच मागणी रेटून धरली. १४ तारखेलासुद्धा आम्ही सनदशीर मार्गानेच आंदोलन करणार आहोत. त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे यांनीसुद्धा हा विषय लावून धरला आहे. यासंबंधात ते म्हणाले की, भाजपातर्फे राज्यात सत्ता आल्यास आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले जात होते. आता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही भाजपचीच सत्ता आहे. तेव्हा हा प्रश्न सोडविण्यात कुठली अडचण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत नागपूरचे असून त्यांना या विषयाची चांगली जाण आहे. तेव्हा त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लीजचा प्रश्न राज्य शसनाकडे प्रलंबित असल्याने आंबेडकरी जनतेच्यावतीने पुन्हा एकदा संयुक्त शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन विनंती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)