शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

वीज कर्मचारी संपावर, कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:31 IST

वीज कंपन्यांची पुनर्रचना आणि वितरण प्रणालीच्या फ्रेन्चाईजीच्या विरुद्ध राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. नागपुरात वीज कर्मचाऱ्यांनी काटोल रोड येथील विद्युत भवनासमोर दिवसभर निदर्शने करीत प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केली. या संपात तब्बल ८० टक्के कर्मचारी, अधिकारी अभियंते सहभागी असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. परंतु वीज प्रशासनाने मात्र संपाचा कुठलाही परिणाम पडला नसल्याचे स्पष्ट केले. ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचारी कामावर असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देकामगार संघटनांचा ८० टक्के कर्मचारी-अधिकारी संपावर असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज कंपन्यांची पुनर्रचना आणि वितरण प्रणालीच्या फ्रेन्चाईजीच्या विरुद्ध राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. नागपुरात वीज कर्मचाऱ्यांनी काटोल रोड येथील विद्युत भवनासमोर दिवसभर निदर्शने करीत प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केली. या संपात तब्बल ८० टक्के कर्मचारी, अधिकारी अभियंते सहभागी असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. परंतु वीज प्रशासनाने मात्र संपाचा कुठलाही परिणाम पडला नसल्याचे स्पष्ट केले. ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचारी कामावर असल्याचे स्पष्ट केले.राज्यव्यापी संपाअंतर्गत सोमवारी सकाळी नागपूर शहरातील कर्मचारी, इंजिनियर्स काटोल रोडवरील प्रादेशिक संचालकांच्या कार्यालयासमोर एकत्र आले. यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटन, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन व महाराष्ट्र राज्य वीज कामगार युनियनशी संबंधित कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते. प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गेटसमोर सभा घेतली. यामुळे काही वेळासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. या सभेला कर्मचारी नेते कॉ.मोहन शर्मा, सी.एम. मौर्य, पी. वी. नायडू, श्रीमती अमृते, शंकर पहाडे, सुनील बोशे, रवि बराई व रवी वैद्य यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शासनाची धोरणे कामगारविरोधी आहेत. त्यांनी वीज कंपन्यांच्या पुनर्रचनेचा विरोध केला. तसेच मुंब्रा, शील, कळवा व मालेगाव हे विभाग खासगी भांडवलदार कंपन्यांना देण्याचा विरोध केला. महाजेनकोची लघुजलविद्युत योजना सरकारला हस्तांतरित करणे, २१० मेगावॅटपर्यंतचे वीज केंद्र बंद करणे आणि आऊटसोर्सिंगच्या विरुद्ध आवाज बुलंद केला. संघटनांनी पेन्शन योजना लागू करणे आणि बदलीचे धोरण तयार करण्याची मागणी केली.या संपाचा थोडाफार परिणाम महावितरणमध्ये दिसून आला. परंतु कुठेही वीज पुरवठा प्रभावित झाल्याचे वृत्त नाही. महाजेनकोच्या कोराडी व खापरखेडा वीज केंद्रातील उत्पादन प्रभावीत झाले नाही. माजी आमदार आशिष देशमुख आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी विद्युत भवन येथे येऊन संपकरी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला.वीज सेवा सुरळीतदुसरीकडे महावितरणने स्पष्ट केले की, संपामुळे वीज सेवेवर कुठलाही परिणाम पडलेला नाही. वीज सेवा सुरळीत सुरू होती. ५० टक्के कर्मचारीही संपात सहभागी झाले नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे की, कुठलेही पद कमी करण्यात येणार नाही. कामगार संघटनांशी चर्चेनंतरच हा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील रस्तापेठ व गणेशखिंड मंडळ, भांडुप येथील वाशी व ठाणे मंडळ, तसेच कल्याण मंडळात याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या उणिवा व त्रुटी दूर करण्यासाठी महावितरणचे संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ग्राहक व कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन पुनर्रचना निश्चित केली जाईल. याचा उद्देश कर्मचाऱ्यांमधील तणाव कमी करणे हा आहे. कंपनीने सांगितले की, फ्रेन्चाईसीकरणाचे धोरण कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊनच मंजूर करण्यात आलेले आहे.

 

 

 

 

टॅग्स :Employeeकर्मचारीStrikeसंप