शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

वीज कर्मचारी संपावर, कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:31 IST

वीज कंपन्यांची पुनर्रचना आणि वितरण प्रणालीच्या फ्रेन्चाईजीच्या विरुद्ध राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. नागपुरात वीज कर्मचाऱ्यांनी काटोल रोड येथील विद्युत भवनासमोर दिवसभर निदर्शने करीत प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केली. या संपात तब्बल ८० टक्के कर्मचारी, अधिकारी अभियंते सहभागी असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. परंतु वीज प्रशासनाने मात्र संपाचा कुठलाही परिणाम पडला नसल्याचे स्पष्ट केले. ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचारी कामावर असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देकामगार संघटनांचा ८० टक्के कर्मचारी-अधिकारी संपावर असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज कंपन्यांची पुनर्रचना आणि वितरण प्रणालीच्या फ्रेन्चाईजीच्या विरुद्ध राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. नागपुरात वीज कर्मचाऱ्यांनी काटोल रोड येथील विद्युत भवनासमोर दिवसभर निदर्शने करीत प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केली. या संपात तब्बल ८० टक्के कर्मचारी, अधिकारी अभियंते सहभागी असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. परंतु वीज प्रशासनाने मात्र संपाचा कुठलाही परिणाम पडला नसल्याचे स्पष्ट केले. ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचारी कामावर असल्याचे स्पष्ट केले.राज्यव्यापी संपाअंतर्गत सोमवारी सकाळी नागपूर शहरातील कर्मचारी, इंजिनियर्स काटोल रोडवरील प्रादेशिक संचालकांच्या कार्यालयासमोर एकत्र आले. यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटन, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन व महाराष्ट्र राज्य वीज कामगार युनियनशी संबंधित कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते. प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गेटसमोर सभा घेतली. यामुळे काही वेळासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. या सभेला कर्मचारी नेते कॉ.मोहन शर्मा, सी.एम. मौर्य, पी. वी. नायडू, श्रीमती अमृते, शंकर पहाडे, सुनील बोशे, रवि बराई व रवी वैद्य यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शासनाची धोरणे कामगारविरोधी आहेत. त्यांनी वीज कंपन्यांच्या पुनर्रचनेचा विरोध केला. तसेच मुंब्रा, शील, कळवा व मालेगाव हे विभाग खासगी भांडवलदार कंपन्यांना देण्याचा विरोध केला. महाजेनकोची लघुजलविद्युत योजना सरकारला हस्तांतरित करणे, २१० मेगावॅटपर्यंतचे वीज केंद्र बंद करणे आणि आऊटसोर्सिंगच्या विरुद्ध आवाज बुलंद केला. संघटनांनी पेन्शन योजना लागू करणे आणि बदलीचे धोरण तयार करण्याची मागणी केली.या संपाचा थोडाफार परिणाम महावितरणमध्ये दिसून आला. परंतु कुठेही वीज पुरवठा प्रभावित झाल्याचे वृत्त नाही. महाजेनकोच्या कोराडी व खापरखेडा वीज केंद्रातील उत्पादन प्रभावीत झाले नाही. माजी आमदार आशिष देशमुख आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी विद्युत भवन येथे येऊन संपकरी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला.वीज सेवा सुरळीतदुसरीकडे महावितरणने स्पष्ट केले की, संपामुळे वीज सेवेवर कुठलाही परिणाम पडलेला नाही. वीज सेवा सुरळीत सुरू होती. ५० टक्के कर्मचारीही संपात सहभागी झाले नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे की, कुठलेही पद कमी करण्यात येणार नाही. कामगार संघटनांशी चर्चेनंतरच हा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील रस्तापेठ व गणेशखिंड मंडळ, भांडुप येथील वाशी व ठाणे मंडळ, तसेच कल्याण मंडळात याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या उणिवा व त्रुटी दूर करण्यासाठी महावितरणचे संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ग्राहक व कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन पुनर्रचना निश्चित केली जाईल. याचा उद्देश कर्मचाऱ्यांमधील तणाव कमी करणे हा आहे. कंपनीने सांगितले की, फ्रेन्चाईसीकरणाचे धोरण कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊनच मंजूर करण्यात आलेले आहे.

 

 

 

 

टॅग्स :Employeeकर्मचारीStrikeसंप