शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कठोर शिक्षेची तरतूद : शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:06 IST

शेताच्या कुंपणात अवैधरीत्या वीजपुरवठा जोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात येत असून, भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने, शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवन्यप्राणी आणि मनुष्यहानीचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेताच्या कुंपणात अवैधरीत्या वीजपुरवठा जोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात येत असून, भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने, शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात येत असल्याने मागील काही महिन्यांत अनेक वन्यप्राणी आणि मनुष्यहानी झाली आहे. शिवाय अशाप्रकारच्या घटनांचा गैरफायदा घेत शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत. ९ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी परिसरात शेतीच्या कुंपणात प्रवाहित विजेच्या धक्क्याने गणपत उकुंडे या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यापूर्वी १७ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील गिरोला रिठी येथे दोन रानगवे आणि त्यांच्या दोन पिल्लांचाही शेतीच्या कुंपणात प्रवाहित विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.विदर्भातील वन परिक्षेत्रालगतच्या परिसरातील शेतातील पिकाच्या रक्षणासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात येत असली तरी यामुळे होणारे प्राणांकित अपघात सर्वस्वी चिंतेचा विषय आहे. २३ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतर्गत वलमाझरी जंगल शिवारात रानगव्याची शिकार याचप्रकारे करण्यात आली होती, तर २३ मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार येथे शेती कुंपणातील विजेच्या धक्क्याने रानगव्याचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांसोबतच याचा फटका सामान्य जनतेलाही बसत असून, ८ जुलै रोजी वर्धा जिल्ह्यातील बाळापूर येथे रामराव टिपले या शेतकऱ्याचा मृत्यूही शेतीकुंपणातील विजेच्या धक्क्याने झाला आहे. तर मागील वर्षी १७ आॅक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहिरी येथे एका वाघिणीचाही मृत्यू अशाच प्रकारे विजेच्या धक्क्याने झाला होता. याप्रकरणात संबंधित शेतमालकाला अटक झालेली असून, ३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात तर ७ नोव्हेंबर रोजी चिमूर येथेही शेतीच्या कुंपणातील विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळले होते.७ वर्षांची तरतूदशेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करणे म्हणजे वीजेचा अवैध वापर असून याकरिता भारतीय विद्युत कायदयात शिक्षेची तरतूद आहे, मनुष्यहानी झाल्यास सदोष मणुष्यवध किंवा मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा भारतिय दंड संहितेच्या कलम ३०४ आणि इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येत असून एखाद्या वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असून यात ७ वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. सोबतच अश्या प्रकारे शेती कुंपणात वीज प्रावाहित करणाऱ्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याचीही तरतुद असल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकारे वीजेचा अवैध वापर टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज