शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

तणावग्रस्त जवान घेत आहेत सहकाऱ्यांचे बळी, 5 वर्षांत 9 घटना

By नरेश डोंगरे | Updated: August 1, 2023 21:51 IST

२० जणांनी नाहक गमावला जीव

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सुरक्षेच्या नावाखाली ज्यांच्या हातात शस्त्रे दिली जाते. तिच मंडळी आपल्या सहकाऱ्यांच्या जिवावर उठत आहे. गेल्या पाच वर्षांत आपल्याच साथीदारांची हत्या केल्याच्या 9 घटना उजेडात आल्या आहेत. या घटनांमध्ये २० जणांचे जीव गेले आहे.

संरक्षण मंत्रालयाचा थिंक टँक मानला जाणाऱ्या युनायटेड सर्व्हीस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने (यूएसआय) दोन वर्षांपूर्वी एक अहवाल दिला होता. त्यात सुरक्षा यंत्रणेत काम करणारी अर्ध्यापेक्षा जास्त मंडळी तणावग्रस्त असल्याचे म्हटले होते. या तणावाचे कारण वेगवेगळे असले तरी प्रामुख्याने सोबत काम करणारे वरिष्ठ कुचंबना करीत असल्याची भावना तीव्र झाल्यानंतर अशा घटना घडतात, असे सुरक्षा यंत्रणांत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मत आहे. जयपूर - मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे घडलेल्या घटनेतून हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

सुरक्षा यंत्रणांमध्ये काम करणारी बहुतांश मंडळी कुटुंबापासून दूर राहते. त्यात सततची दगदग, वेळी-अवेळी मिळणारे जेवण, अपूर्ण झोप आणि वरिष्ठांकडून पडणारी झाप ही या मंडळींना चिडचिडेपणा देऊन जाते. त्यामुळे ते शिघ्रकोपी बनतात आणि नंतर क्षणिक कारणावरून त्यांच्याकडून असे भयावह कृत्य घडते.

गडचिरोली जिल्ह्यात चार आठवड्यांपूर्वी राज्य राखीव पोलीस दलाचा जवान सुरेश मोतीलाल राठोड यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान मारोती सातपुते (वय ३३) याने चाकूने हत्या केली. २१ मे २०२३ ला बिहार विशेष सशस्त्र पोलीस दलातील जवान सोनू कुमार याची आरोपी जवान कैमूर याने गोळी मारून हत्या केली. २५ डिसेंबर २०२२ ला कांकेर छत्तीसगडमध्ये सीएएफचा जवान पुरुषोत्तम सिंह याने मेजर सुरेंद्र भगतची गोळी मारून हत्या केल्याचे उघड झाले. तर, जम्मू काश्मिरच्या पुंछ मध्ये आरोपी जवान अहमद याने त्याचा सहकारी जवान ईबरारची गोळी झाडून हत्या केली. नंतर स्वत: आत्महत्या केल्याची घटना १५ जूलै २०२२ ला उजेडात आली.

मोठ्या घटना - सुकमा, छत्तीसगड

नोव्हेंबर २०२१ मध्ये नक्षलग्रस्त सुकमा (छत्तीसगड) मध्ये सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनमध्ये कार्यरत जवान रितेश रंजन याने एके ४७ ने अंधाधूंद गोळीबार करून सीआरपीएफचे चार जवान धनजी, राजीव मंडल, राजमनी कुमार यादव आणि धर्मेंद्र कुमार यांची हत्या केली. तर धनंजय कुमार सिंह, धरमात्मा कुमार आणि मलय रंजन महाराणा या चाैघांना जखमी केले होते.छत्तीसगडमधीलच दुसऱ्या एका घटनेत छत्तीसगड आर्म्स फोर्सच्या जवानाने आपल्या दोन साथीदारांना गोळ्या घालून ठार मारले होते.

गाजियाबाद, उत्तर प्रदेश

चार वर्षांपूर्वी गाजियाबादमध्ये एका जवानाने ईंसासने फायरिंग करून तीन सहकारी जवानांची हत्या केली होती.

मुंबई, महाराष्ट्र

मुंबई जयपूरमध्ये आरोपी चेतन सिंह याने त्याचे वरिष्ठ सहकारी आरपीएफचे फाैजदार टिकाराम मिना यांच्यासह चाैघांची हत्या केली. गेल्या आठवड्यात पुण्यात एका एसीपीने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली. वारंवार घडणाऱ्या या भयावह घटना सुरक्षा यंत्रणांत काम करणाऱ्या पोलिसांपासून, जवानांपासून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी बोधप्रद ठराव्या.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिस