शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

दैनिक संकलनाचे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:19 IST

ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.सहकार विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये सुमारे १ हजार ८९ सहकारी पतसंस्था आहेत. यातील अनेक पतसंस्था बऱ्याच जुन्या असून सहकार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत. नागपूर शहरामध्ये सुमारे अडीच ते ३ हजार दैनिक संकलक आहेत. ते खातेदारांकडून दररोज ठराविक रक्कम गोळा करून संबंधिताच्या खात्यामध्ये बचत स्वरूपात जमा करतात. यातील बहुतेक खातेदार हातठेलाचालक, फूटपाथ व्यावसायिक तसेच गरीब वर्गातील आहेत. हे प्रतिनिधी घरपोच सेवा देत असल्याने या वर्गाला बचतीची सवय लागली आहे. या माध्यमातून अनेकांना पतसंस्थांचे कर्जही उपलब्ध झाले आहे.या दैनिक संकलनातून प्रतिनिधींना ठराविक कमिशन मिळते. तसेच त्यांच्या माध्यमातून झालेल्या कर्जपुरवठ्याच्या वसुलीचेही कमिशन मिळते. एक संकलक पाच ते सहा तासात साधारणत: २० ते ३० हजार रुपयांचे कलेक्शन करतो. त्यावरील कमिशनवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. व्यवहार बंद असल्याने संबंधित खातेदारांना दैनिक ठेव जमा करणे तसेच घेतलेल्या कर्जाचा परतावा करणेही अशक्य झाले आहे. यामुळे संकलकांसोबतच पतसंस्थाही आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.राखीव निधीतून २५ टक्के द्यादैनिक संकलकांना काम सुरू करताना संबंधित पतसंस्थांकडे अमानत रक्कम जमा करावी लागते. राखीव निधी या हेडखाली ही ५ टक्के रक्कम पतसंस्थाकडे जमा असते. ही ठेव संकलकाच्या व्यवसायावर अवलंबून असते. अनेकांच्या ठेवी जवळपास ५ लाखांपर्यंतही पोहचल्या आहेत. या संकटाच्या काळात राखीव निधीतून २५ टक्के रक्कम द्यावी, अशी मागणी संकलकांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.मागील तीन महिन्यांपासून वसुली ठप्प असल्याने पतसंस्थांच्या व्यवसायावर तसेच आम्हा संकलकांवरही प्रचंड आर्थिक ताण आला आहे. यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आम्हाला पॅकेज द्यावे तसेच, राखीव निधीमधून २५ टक्के रक्कम परत केली जावी.धर्मेंद्र कारेमोरे, दैनिक संकलक

टॅग्स :MONEYपैसाnagpurनागपूर