शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दैनिक संकलनाचे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:19 IST

ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.सहकार विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये सुमारे १ हजार ८९ सहकारी पतसंस्था आहेत. यातील अनेक पतसंस्था बऱ्याच जुन्या असून सहकार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत. नागपूर शहरामध्ये सुमारे अडीच ते ३ हजार दैनिक संकलक आहेत. ते खातेदारांकडून दररोज ठराविक रक्कम गोळा करून संबंधिताच्या खात्यामध्ये बचत स्वरूपात जमा करतात. यातील बहुतेक खातेदार हातठेलाचालक, फूटपाथ व्यावसायिक तसेच गरीब वर्गातील आहेत. हे प्रतिनिधी घरपोच सेवा देत असल्याने या वर्गाला बचतीची सवय लागली आहे. या माध्यमातून अनेकांना पतसंस्थांचे कर्जही उपलब्ध झाले आहे.या दैनिक संकलनातून प्रतिनिधींना ठराविक कमिशन मिळते. तसेच त्यांच्या माध्यमातून झालेल्या कर्जपुरवठ्याच्या वसुलीचेही कमिशन मिळते. एक संकलक पाच ते सहा तासात साधारणत: २० ते ३० हजार रुपयांचे कलेक्शन करतो. त्यावरील कमिशनवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. व्यवहार बंद असल्याने संबंधित खातेदारांना दैनिक ठेव जमा करणे तसेच घेतलेल्या कर्जाचा परतावा करणेही अशक्य झाले आहे. यामुळे संकलकांसोबतच पतसंस्थाही आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.राखीव निधीतून २५ टक्के द्यादैनिक संकलकांना काम सुरू करताना संबंधित पतसंस्थांकडे अमानत रक्कम जमा करावी लागते. राखीव निधी या हेडखाली ही ५ टक्के रक्कम पतसंस्थाकडे जमा असते. ही ठेव संकलकाच्या व्यवसायावर अवलंबून असते. अनेकांच्या ठेवी जवळपास ५ लाखांपर्यंतही पोहचल्या आहेत. या संकटाच्या काळात राखीव निधीतून २५ टक्के रक्कम द्यावी, अशी मागणी संकलकांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.मागील तीन महिन्यांपासून वसुली ठप्प असल्याने पतसंस्थांच्या व्यवसायावर तसेच आम्हा संकलकांवरही प्रचंड आर्थिक ताण आला आहे. यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आम्हाला पॅकेज द्यावे तसेच, राखीव निधीमधून २५ टक्के रक्कम परत केली जावी.धर्मेंद्र कारेमोरे, दैनिक संकलक

टॅग्स :MONEYपैसाnagpurनागपूर