शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

दैनिक संकलनाचे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:19 IST

ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.सहकार विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये सुमारे १ हजार ८९ सहकारी पतसंस्था आहेत. यातील अनेक पतसंस्था बऱ्याच जुन्या असून सहकार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत. नागपूर शहरामध्ये सुमारे अडीच ते ३ हजार दैनिक संकलक आहेत. ते खातेदारांकडून दररोज ठराविक रक्कम गोळा करून संबंधिताच्या खात्यामध्ये बचत स्वरूपात जमा करतात. यातील बहुतेक खातेदार हातठेलाचालक, फूटपाथ व्यावसायिक तसेच गरीब वर्गातील आहेत. हे प्रतिनिधी घरपोच सेवा देत असल्याने या वर्गाला बचतीची सवय लागली आहे. या माध्यमातून अनेकांना पतसंस्थांचे कर्जही उपलब्ध झाले आहे.या दैनिक संकलनातून प्रतिनिधींना ठराविक कमिशन मिळते. तसेच त्यांच्या माध्यमातून झालेल्या कर्जपुरवठ्याच्या वसुलीचेही कमिशन मिळते. एक संकलक पाच ते सहा तासात साधारणत: २० ते ३० हजार रुपयांचे कलेक्शन करतो. त्यावरील कमिशनवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. व्यवहार बंद असल्याने संबंधित खातेदारांना दैनिक ठेव जमा करणे तसेच घेतलेल्या कर्जाचा परतावा करणेही अशक्य झाले आहे. यामुळे संकलकांसोबतच पतसंस्थाही आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.राखीव निधीतून २५ टक्के द्यादैनिक संकलकांना काम सुरू करताना संबंधित पतसंस्थांकडे अमानत रक्कम जमा करावी लागते. राखीव निधी या हेडखाली ही ५ टक्के रक्कम पतसंस्थाकडे जमा असते. ही ठेव संकलकाच्या व्यवसायावर अवलंबून असते. अनेकांच्या ठेवी जवळपास ५ लाखांपर्यंतही पोहचल्या आहेत. या संकटाच्या काळात राखीव निधीतून २५ टक्के रक्कम द्यावी, अशी मागणी संकलकांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.मागील तीन महिन्यांपासून वसुली ठप्प असल्याने पतसंस्थांच्या व्यवसायावर तसेच आम्हा संकलकांवरही प्रचंड आर्थिक ताण आला आहे. यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आम्हाला पॅकेज द्यावे तसेच, राखीव निधीमधून २५ टक्के रक्कम परत केली जावी.धर्मेंद्र कारेमोरे, दैनिक संकलक

टॅग्स :MONEYपैसाnagpurनागपूर