शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

मनपात काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 23:45 IST

congress politics in NMC काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेतही स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देपटोलेंच्या भूमिकेला दिल्लीत पाठबळ : नागपुरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेतही स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेशी महाविकास आघाडी न करता संपूर्ण जागांवर काँग्रेस लढली, तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढावे, अशी भूमिका शहर काँग्रेसने पूर्वीच घेतली आहे. महापालिकेत

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेची आघाडी करू नये, अशा मागणीचा ठराव दीड वर्षापूर्वी शहर काँग्रेसच्या बैठकीत संमत करण्यात आला होता. पुढे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील स्वबळाचा नारा दिल्यामुळे शहर काँग्रेसच्या भूमिकेला बळ मिळाले. आता पटोले यांना दिल्लीतून पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेसला आघाडी का नको ?

- आघाडीबाबात चर्चा करताना राष्ट्रवादी अस्वास्तव जागांची मागणी करते.

- काँग्रेस १०० टक्के जिंकेल, अशा जागांसाठी राष्ट्रवादी अडून बसते.

- या वाटाघाटीत निवडणुकीच्या काळातील महत्त्वाचा वेळ वाया जातो. फलित काहीच होत नाही.

- लोकसभेनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत नागपुरात काँग्रेसची मते वाढतच गेली आहेत.

- राष्ट्रवादीची शहरात फारशी ताकद नाही. एकच नगरसेवक तोही स्वब‌ावर निवडणूक आला.

- आघाडीत शिवसेनेलाही जागा सोडाव्या लागतील. काँग्रेसच्या तेवढ्या जागा लढण्यापूर्वीच कमी होतील.

- तशीही नागपुरात शिवसेना ही भाजपची मते कमी करते. त्यामुळे सोबत लढून काँग्रेसचा फायदा नाही.

काँग्रेसला उसणवारीवर उमेदवार घ्यावे लागत नाही

 काँग्रेसच्या विचारांचे मतदार शहरातील प्रत्येक बूथवर आहेत. मित्रपक्षांसाठी ५० जागा सोडल्या तर त्या ठिकाणी पंजा चिन्ह संपेल. असे करून काँग्रेसच्या मतदाराला आपण दुसऱ्या चिन्हावर मत देण्यासाठी बाध्य करीत आहोत. काँग्रेसकडे एका वॉर्डासाठी १० ते १५ तगडे उमेदवार तिकीट मागतात. स्पर्धा एवढी असते की कुणाला तिकीट द्यावी? असा प्रश्न पडतो. आम्हाला उमेदवार उसणवारीवर घ्यावे लागत नाही. त्यामुळे पाच वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.

 आमदार विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक