शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मनपात काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 23:45 IST

congress politics in NMC काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेतही स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देपटोलेंच्या भूमिकेला दिल्लीत पाठबळ : नागपुरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेतही स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेशी महाविकास आघाडी न करता संपूर्ण जागांवर काँग्रेस लढली, तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढावे, अशी भूमिका शहर काँग्रेसने पूर्वीच घेतली आहे. महापालिकेत

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेची आघाडी करू नये, अशा मागणीचा ठराव दीड वर्षापूर्वी शहर काँग्रेसच्या बैठकीत संमत करण्यात आला होता. पुढे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील स्वबळाचा नारा दिल्यामुळे शहर काँग्रेसच्या भूमिकेला बळ मिळाले. आता पटोले यांना दिल्लीतून पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेसला आघाडी का नको ?

- आघाडीबाबात चर्चा करताना राष्ट्रवादी अस्वास्तव जागांची मागणी करते.

- काँग्रेस १०० टक्के जिंकेल, अशा जागांसाठी राष्ट्रवादी अडून बसते.

- या वाटाघाटीत निवडणुकीच्या काळातील महत्त्वाचा वेळ वाया जातो. फलित काहीच होत नाही.

- लोकसभेनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत नागपुरात काँग्रेसची मते वाढतच गेली आहेत.

- राष्ट्रवादीची शहरात फारशी ताकद नाही. एकच नगरसेवक तोही स्वब‌ावर निवडणूक आला.

- आघाडीत शिवसेनेलाही जागा सोडाव्या लागतील. काँग्रेसच्या तेवढ्या जागा लढण्यापूर्वीच कमी होतील.

- तशीही नागपुरात शिवसेना ही भाजपची मते कमी करते. त्यामुळे सोबत लढून काँग्रेसचा फायदा नाही.

काँग्रेसला उसणवारीवर उमेदवार घ्यावे लागत नाही

 काँग्रेसच्या विचारांचे मतदार शहरातील प्रत्येक बूथवर आहेत. मित्रपक्षांसाठी ५० जागा सोडल्या तर त्या ठिकाणी पंजा चिन्ह संपेल. असे करून काँग्रेसच्या मतदाराला आपण दुसऱ्या चिन्हावर मत देण्यासाठी बाध्य करीत आहोत. काँग्रेसकडे एका वॉर्डासाठी १० ते १५ तगडे उमेदवार तिकीट मागतात. स्पर्धा एवढी असते की कुणाला तिकीट द्यावी? असा प्रश्न पडतो. आम्हाला उमेदवार उसणवारीवर घ्यावे लागत नाही. त्यामुळे पाच वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.

 आमदार विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक