शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

नागपुरात रस्त्यावर वाढली भिक्षेकरूंची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 21:40 IST

अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देटाळेबंदीत शिथिलता देताच गजबज : कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची गर्दीही रस्त्यावर कमी झाली आणि त्याचप्रमाणे नेहमी भिक्षेसाठी पुढे येणारे हातही रस्त्यांवरून गायब झाले. आता टाळेबंदीत शिथिलता दिल्यामुळे हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत होत चालले आहेत. गेल्या अडीच महिन्याहून अधिक काळापासून आपल्या निवाऱ्यात बसून असणारे भिक्षेकरू पुन्हा रस्त्यांवर सक्रिय झाले. स्वत:च्या पाल्याला कडेवर घेऊन या भिक्षेकरू स्त्रिया इतर नागरिकांकडून पैसे देण्यासाठी विनवणी करताना दिसत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या अंगाला हात लावून हे भिक्षेकरू भीक मागत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भौतिक दूरता राखणे गरजेचे आहे. पण हे भिक्षेकरू चौकातील दुचाकी व चारचाकी वाहनांपुढे येऊन उभे होतात. काही पैसे द्या, अशी याचना करीत दुचाकीस्वाराच्या पाया पडतात, चारचाकी वाहनांच्या खिडक्यांवर हात ठेवून जोवर खिडकीचा काच खाली होत नाही तोपर्यंत ठकठक करत असतात. त्यामुळे भीतीपोटी का होईना नागरिक लगेच आपल्या खिशात हात घालतात आणि हाती लागतील तेवढे पैसे देऊन टाकतात. मध्यंतरी कोरोनामुळे एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिक या भिक्षेकरूंनपासून सावध राहण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. टाळेबंदीच्या दरम्यान अनेक समाजसेवी संस्थानी या भिक्षेकरूंना त्यांच्या निवाऱ्यात जाऊन धान्याची मदत केली. अन्नाचा पुरवठा केला आणि अनेकांकडे किटदेखील पोहचल्या आहेत. त्यामुळे आजच्या घडीला कुणी भिकारी उपाशी किंवा धान्यापासून वंचित असल्याचे दिसत नाही. तरीही हे भिक्षेकरू रस्त्यावर मास्क परिधान न करता बिनधास्त फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. प्रशासनाने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

टॅग्स :Beggerभिकारीnagpurनागपूर