शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

नागपुरात कोरोना प्रादुर्भावाचा धोकाही वाढला : नागरिकांमध्ये संताप, कडक कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 03:20 IST

एकीकडे कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी स्थिती असताना नागपुरातील रस्त्यारस्त्यांवर बेजबाबदारांची वर्दळ वाढल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या बेजबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त मागणी पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी स्थिती असताना नागपुरातील रस्त्यारस्त्यांवर बेजबाबदारांची वर्दळ वाढल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या बेजबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त मागणी पुढे आली आहे.नागपुरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबधितांची संख्या सारखी वाढत आहे. बुधवारी अचानक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने उपराजधानीकर अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्त्यांवर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. लॉकडाऊन संपल्यासारखे आणि कोणताच धोका नसल्यासारखे वाहनचालक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पोलिसांकडून दंड्यांचा प्रसाद देणे कमी झाल्यामुळे आणि कोणतीही चौकशी न करता किंवा अडवले जात नसल्याने रिकामटेकडे मंडळी चांगलीच निर्ढावली आहे. ज्यांना अत्यावश्यक काम आहे, अशातील मंडळी कमी आणि कोणतेही काम नसताना रस्त्यावर फिरणारे रिकामटेकडे जास्त आहेत.या रिकामटेकड्यांच्या फेरफटक्यामुळे शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचा धोका आणखीनच जास्त वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी आणि विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढविणाऱ्या रिकामटेकड्यांना धडा शिकवावा, अशी मागणी पुढे आली आहे.

पोलीस आयुक्तांकडून दखलदोन दिवसांपासून विविध भागात रस्त्यांवर वाढलेली वाहनधारकांची गर्दी बघून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय चांगलेच नाराज झाले. त्यांनी आज दुपारी शहरातील सर्व अधिकाऱ्यांना कडक बंदोबस्ताचे आदेश दिले. वायरलेसवर सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांशी संवाद साधून त्यांनी रस्त्यारस्त्यावर नाकेबंदी कडक करण्याच्या सूचना केल्या. कुणालाही अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यास मुभा देऊ नका, असेही निर्देश दिले. मात्र ज्यांना अत्यावश्यक काम आहे अशांना त्यांच्या कामानिमित्त जाऊ द्या, असेही पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाºयांना सांगितले.दुपारी आदेश, सायंकाळी पाहणीदुपारी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही ते बघण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय आज सायंकाळी शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर फिरले. त्यांनी वेगवेगळ्या चौकात आणि मुख्य मार्गावर भेटी देऊन तेथील नाकेबंदी तसेच बंदोबस्ताची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते दिशानिर्देशही दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर