शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रुजली, राज्यात विस्तारली पथनाट्य चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 10:38 IST

समाज परिवर्तनाच्या विचाराने प्रेरित झालेली ही पथनाट्य चळवळ उपराजधानीत रुजली आणि पुढे महाराष्ट्रभर बहरत गेली.

ठळक मुद्देसमाजाचे वास्तव मांडणारी परिवर्तनवादी नाट्यकलायोजनांच्या प्रचाराचेही प्रभावी माध्यम

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्यगृह, रंगमंच, पडदा आणि दिग्दर्शकांच्या निर्देशानुसार अभिनय करणारे कलावंत अशा साच्यात बंदिस्त असलेली नाट्यकला एवढीच ओळख १९७० पर्यंत प्रेक्षकांना होती. अशात समांतर सिनेमाप्रमाणे प्रायोगिक रंगभूमी मूळ धरू लागली होती. नाटकांच्या एका वेगळ्या प्रकाराने लोकांना भुरळ पाडली. रंगमंच नाही, पडदा नाही आणि ठरलेली संहिताही नाही. नाटक सजायचे ते रस्त्यावर कुठेही. हो, पण त्यात समाजातील समस्यांचे धगधगते वास्तव मात्र होते आणि हे वास्तव बहुसंख्य वर्गाच्या हृदयाला भिडले होते. हे होते पथनाट्य. समाज परिवर्तनाच्या विचाराने प्रेरित झालेली ही पथनाट्य चळवळ उपराजधानीत रुजली आणि पुढे महाराष्ट्रभर बहरत गेली.पथनाट्य ही नाट्यकला, नव्हे परिवर्तनाची चळवळ नागपूरच्या मातीत रुजविणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अस्वस्थ काळातील भारावलेला इतिहास मांडला. साधारणत: स्वातंत्र्याची दोन-तीन दशके लोटल्यानंतरचा तो काळ. जी आशा, अपेक्षा घेऊन स्वातंत्र्याची पहाट उगवली होती, ती पूर्ण होताना दिसत नव्हती. गरिबी, बेरोजगारी अशा समस्यांनी समाजमन होरपळत असताना तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरत होती. विद्रोही व दलित साहित्याच्या उदयाचाही हाच काळ. सिनेमाच्या भाषेत अमिताभ बच्चन नावाचे व्यक्तिमत्त्व उभे राहण्याचा काळ. अशा अस्वस्थ काळात सामाजिक व राजकीय जाणिवा असलेले ‘तिसरे थिएटर’ बादल सरकार आणि उत्पल दत्त यांच्या नेतृत्वात बंगालमध्ये बहरत होते व पथनाट्य या नावाने ते पंजाब, दिल्लीपर्यंत पसरले होते. खरं तर अगदी अमेरिकेतील निग्रोंचा लढा, जर्मनी ते जगभरात परिवर्तनाच्या आंदोलनामध्ये पथनाट्याने प्रचंड प्रभाव घातला होता. मात्र या काळात महाराष्ट्रतील नाट्य क्षेत्रात हे परिवर्तन यायचे होते. एका विशिष्ट वर्गाच्या कलादृष्टीपुरते मर्यादित असलेले हे क्षेत्र परिवर्तनवाद्यांना मात्र अस्वस्थ करीत होते. मुंबईत छबीलदास यांचे प्रायोगिक रंगभूमीने वाटचाल सुरू केली होती, तर विदर्भात काही परिवर्तनवादी तरुणांच्या हुंकारातून पथनाट्याचे वारे वाहू लागले होते.

रस्त्यावरील काव्यवाचन, सिंधी तरुणाचे पथनाट्यडॉ. श्रीपाद जोशी यांच्यानुसार त्या काळात हौशी व व्यावसायिक नाटक संस्थांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू असताना नवतरुणांमध्ये नवे काहीतरी करण्याची ऊर्मी लागली होती. याचदरम्यान देबाशिष रॉय या बंगाली दिग्दर्शकाद्वारे नागपुरात सादर होत असलेल्या बंगाली नाटकांनी एक नवी दृष्टी या तरुणांना दिली. साधारणत: १९७५-७६ च्या काळात रस्त्यावर काव्यपाठाचा उपक्रम सुरू झाला. अर्थात डॉ. जोशी यांची ललित कला संस्था व आंबेडकरी कवींची मुक्तीवाहिनी या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. हे पथकाव्य वाचन दर रविवारी आवळेबाबू चौकात रंगायचे, जे पुढे इतरही चौकात पसरू लागले. १९७७ मध्ये लक्ष्मीभुवन चौकात एक दिवस पथनाट्य सादरीकरणासाठी ठरला. अनिल चनाखेकर यांच्या नवप्रतिभा संस्थेचे कलावंत त्यात सहभागी होणार होते. ठरल्यानुसार काव्यवाचन सुरू झाले, मात्र चनाखेकर यांचे कलावंत पोहोचले नाही. याचवेळी श्रोत्यांमध्ये उपस्थित एका सिंधी तरुणाने पुढे येऊन ‘हनुमान जाग उठा’ या विषयावर १५ मिनिटांचे एकपात्री स्क्रिप्ट सादर केले आणि पथनाट्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.आणि सुरू झाला प्रवासयानंतर दीपक ढोणे या तरुणाने लिहिलेल्या ‘शेंगदाणा’ या नाटकाचे अनेक प्रयोग विविध चौकात सादर झाले. यात गजानन पांडे यांच्या नाटकांची पुढे भर पडली. ‘जादुगार आणि गारुडी’चे अनेक प्रयोग सादर झाले. त्यावेळी जीवन विरकट नावाच्या एसीपीने पथनाट्यासाठी शहरातील १२ चौकांना कायम परवानगी दिली. खरे तर या नव्या नाट्यकलेने लोकांना भारावून सोडले होते आणि याची ख्याती बाहेरही पसरत होती. अकोला येथे एका नाट्य स्पर्धेचा परीक्षक म्हणून गेल्यानंतर तेथील आयोजकांनी पथनाट्य बसविण्याचा आग्रह केला. तेव्हा १५ दिवसात त्यांच्यासाठी पथनाट्य तयार केल्याची आठवण डॉ. जोशी यांनी नमूद केली. पुढे अकोल्याच्या या संस्थेने अरविंद देशमुख यांच्या लेखनातून बुलडाण्यापर्यंत पथनाट्याचे ३०० पेक्षा जास्त प्रयोग केले. पथनाट्यातून लेखक निर्माण झाले, त्यासाठी स्वतंत्र संहिता तयार झाल्या. अगदी टीव्हीचा प्रसार होईपर्यंत पथनाट्य कला प्रचंड बहरली होती.साहित्य संस्कृती मंडळाची मान्यतापथनाट्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघता त्यावेळचे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांतर्गत पथनाट्याची स्वतंत्र समिती तयार केली व ५००० रुपये अनुदान जाहीर केले. या माध्यमातून पुढे रायपूरपासून गोव्यापर्यंत कलावंतांनी पथनाट्यांचे प्रयोग करीत महाराष्ट पिंजून काढला होता. वामन पात्रीकर यांचे ‘बाजारपेठ’, ज.रा. फणसाळकरांचे ‘माणसाचा केला देव’ यांच्यासह गजानन सगदेव, दिलीप ठाणेकर, अतुल भुसारी, प्रमोद भुसारी अशा लेखकांचे पथनाट्य महाराष्ट्रत गाजले.दलित रंगभूमीशी एकरूपमहाराष्टष्ट्रत दलित व विद्रोही साहित्याच्या उगमानंतर पथनाट्य हा कलाप्रकार दलित रंगभूमीशी जणू एकरूप झाला. प्रतिष्ठित कला, साहित्यापासून दूर ठेवण्यात आलेल्या या समाजाने पथनाट्याला आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम बनविले. संजय जीवने, प्रभाकर दुपारे, अमर रामटेके अशा नाटककारांनी पथनाट्याच्या संहिता लिहिल्या व सादर केल्या. हे नाट्य माध्यम महाराष्ट्रत पसरले.प्रचारनाट्य ते कॉलेज कट्टापथनाट्य आता समाजाची अस्वस्थता आणि परिवर्तनापुरते मर्यादित राहिले नव्हते. ते प्रचाराचे व प्रबोधनाचे मोठे साधन झाले होते. हुंडा विरोध, स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण संरक्षण, बेटी बचाओ, साक्षरता मोहीम, व्यसनमुक्ती अशा जनजागृतीसाठी ते एक प्रभावी माध्यम ठरले, शिवाय राजकीय पक्षांचे प्रचाराचेही ते साधन झाले. महाविद्यालयीन तरुणांमध्ये याचा प्रचार झपाट्याने झाला, हेही विसरता येणार नाही.

टॅग्स :cultureसांस्कृतिक