शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वादळाचा फटका : विजेचे खांब वाकले, झाडे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:12 IST

गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच फटका बसला. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. डझनभर वृक्ष कोसळून पडले. तासभर हैदोस घातल्यानंतर वादळ शांत झाले. परंतु तोपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगांमुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत पारा ४३.२ डिग्री सेल्सिअसवर आला आहे. २४ तासात कमाल तापमान ३.१ डिग्री सेल्सिअसने खाली आले.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत, बुटीबोरीत फीडरचे १५ वीज खांब कोसळलेजामठ्यातील दोन वीज मनोरे जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच फटका बसला. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. डझनभर वृक्ष कोसळून पडले. तासभर हैदोस घातल्यानंतर वादळ शांत झाले. परंतु तोपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगांमुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत पारा ४३.२ डिग्री सेल्सिअसवर आला आहे. २४ तासात कमाल तापमान ३.१ डिग्री सेल्सिअसने खाली आले.वातावरण अचानक बदलल्याने शहरात वीज वितरण यंत्रणा पूर्णत: प्रभावित झाली. मानकापूर येथून निघणाऱ्या ३३ केव्ही लाईनशी जुळलेले सर्व परिसर अंधारात बुडाले. विनोबा भावेनगर येथे विजेचे खांब वाकले. बिनाकी फीडरवर वृक्ष कोसळल्याने एचटी लाईनचा खांबही पूर्णत: खाली वाकला. दुसरीकडे ग्रामीण भागात महावितरणला मोठा फटका बसला. बुटीबोरी, हिंगणा, मौदा या ग्रामीण भागात वादळी पावसाने थैमान घातल्याने वीज खांब अक्षरश: कोलमडून पडले. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर वृक्ष कोलमडून पडल्याने ग्रामीण भागाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या ठप्प झाल्या. परिणामी नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.बुटीबोरी औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीला अनेक ठिकाणी फटका बसला. बुटीबोरी एमआयडीसी येथील महावितरणच्या उपकेंद्रातून निघणाऱ्या मोरारजी वाहिनीवरील १५ विजेचे खांब संध्याकाळी ५.३० च्या सुमारास आलेल्या वादळामुळे कोलमडून पडले. सोबतच हिंगणा-जामठा या वीज वाहिनीचे दोन मनोरे जमीनदोस्त झाल्याने या भागातील वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता.मौदा शहरालादेखील वादळी पावसाचा फटका बसला. वादळी पावसामुळे मौदा शहरातील सुमारे पाच हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. कळमेश्वर येथील वीज पुरवठा काहीअंशी सुरळीत करण्यात महावितरणला यश आले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य अभियंता घुगल यांनी सांगितले. दीक्षाभूमी येथे चित्रकला महाविद्यालयासमोर एक वृक्ष वादळी पावसामुळे कोसळून रस्त्याच्या मध्ये आले. त्यामुळे वाहतूक विस्कळत झाली होती. बराच वेळ वाहतूक विस्कळीत राहिली.

 

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्तीnagpurनागपूर