शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपुरात वादळाचा फटका : विजेचे खांब वाकले, झाडे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:12 IST

गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच फटका बसला. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. डझनभर वृक्ष कोसळून पडले. तासभर हैदोस घातल्यानंतर वादळ शांत झाले. परंतु तोपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगांमुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत पारा ४३.२ डिग्री सेल्सिअसवर आला आहे. २४ तासात कमाल तापमान ३.१ डिग्री सेल्सिअसने खाली आले.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत, बुटीबोरीत फीडरचे १५ वीज खांब कोसळलेजामठ्यातील दोन वीज मनोरे जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच फटका बसला. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. डझनभर वृक्ष कोसळून पडले. तासभर हैदोस घातल्यानंतर वादळ शांत झाले. परंतु तोपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगांमुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत पारा ४३.२ डिग्री सेल्सिअसवर आला आहे. २४ तासात कमाल तापमान ३.१ डिग्री सेल्सिअसने खाली आले.वातावरण अचानक बदलल्याने शहरात वीज वितरण यंत्रणा पूर्णत: प्रभावित झाली. मानकापूर येथून निघणाऱ्या ३३ केव्ही लाईनशी जुळलेले सर्व परिसर अंधारात बुडाले. विनोबा भावेनगर येथे विजेचे खांब वाकले. बिनाकी फीडरवर वृक्ष कोसळल्याने एचटी लाईनचा खांबही पूर्णत: खाली वाकला. दुसरीकडे ग्रामीण भागात महावितरणला मोठा फटका बसला. बुटीबोरी, हिंगणा, मौदा या ग्रामीण भागात वादळी पावसाने थैमान घातल्याने वीज खांब अक्षरश: कोलमडून पडले. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर वृक्ष कोलमडून पडल्याने ग्रामीण भागाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या ठप्प झाल्या. परिणामी नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.बुटीबोरी औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीला अनेक ठिकाणी फटका बसला. बुटीबोरी एमआयडीसी येथील महावितरणच्या उपकेंद्रातून निघणाऱ्या मोरारजी वाहिनीवरील १५ विजेचे खांब संध्याकाळी ५.३० च्या सुमारास आलेल्या वादळामुळे कोलमडून पडले. सोबतच हिंगणा-जामठा या वीज वाहिनीचे दोन मनोरे जमीनदोस्त झाल्याने या भागातील वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता.मौदा शहरालादेखील वादळी पावसाचा फटका बसला. वादळी पावसामुळे मौदा शहरातील सुमारे पाच हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. कळमेश्वर येथील वीज पुरवठा काहीअंशी सुरळीत करण्यात महावितरणला यश आले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य अभियंता घुगल यांनी सांगितले. दीक्षाभूमी येथे चित्रकला महाविद्यालयासमोर एक वृक्ष वादळी पावसामुळे कोसळून रस्त्याच्या मध्ये आले. त्यामुळे वाहतूक विस्कळत झाली होती. बराच वेळ वाहतूक विस्कळीत राहिली.

 

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्तीnagpurनागपूर