शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

थांबा..., उगीच मारू नका साप ! सर्पमित्रांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:29 IST

साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साप मारले जातात. यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी साप न मारता त्यांना आपल्या स्वाधीन करण्याचे आवाहन नागपुरातील सर्पमित्रांनी केले आहे.

ठळक मुद्देसाप निघाल्यास कळवा अन् पर्यावरण वाचवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साप मारले जातात. यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी साप न मारता त्यांना आपल्या स्वाधीन करण्याचे आवाहन नागपुरातील सर्पमित्रांनी केले आहे.नागपूर शहरात पर्यावरणाच्या रक्षणासाठी धडपडणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्यात सापांच्या रक्षणासाठी कार्य करणाऱ्या संघटना आणि सर्पमित्रांचेही प्रमाण अधिक आहे. वन्यजीव संरक्षण समिती नागपूर, विदर्भ सर्पमित्र संघटना, वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन, नागपूर वाईल्ड लाईफ, हेल्प फॉर अ‍ॅनिमल, हेल्पींग हँड फॉर अ‍ॅनिमल यासारख्या अनेक संघटना कार्यरत आहेत. या संघटनांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात आणि शहरालगतच्या क्षेत्रात सेवा देणारे सर्पमित्र कार्यरत आहेत. साप निघाल्यावर नागरिकांनी संपर्क केल्यावर घटनास्थळी पोहचून सापाला पकडून सुरक्षितपणे मानवी वसाहतीबाहेर सोडण्याचे काम हे पर्यावरणपे्रमी करीत असतात.पावसाळ्याची सुरुवात होताच जमिनीत असलेल्या सापांच्या निवासस्थानी पावसाचे पाणी शिरल्यास साप जमिनीबाहेर पडतात. कोरड्या जागेच्या शोधात अथवा भक्ष्याच्या शोधात घरात किंवा कंपाऊंडमध्ये शिरतात. अशा वेळी सर्पदंशाची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात गम बुट वापरणे, शुज पायात घालताना खबरदारी घेणे, अडगळीच्या ठिकाणी हात घालणे टाळणे, लाईटवरील किडे खाण्यासाठी येणाºया पाली आणि बेडकांच्या शोधात येण्याची सापांची शक्यता असल्याने बाहेर निघताना काळजी घेणे यासारखी जुजबी खबरदारी घेतली तर दुर्घटना टळू शकते. सापांच्या २ हजार ७०० जाती असल्या तरी विदर्भात फक्त नाग, मन्यार, घोणस, फुरसे या चार जातीचे विषारी साप प्रामुख्याने आढळतात. त्यामुळे साप न मारता आम्हाला कळवा आणि पर्यावरण वाचवा, असे आवाहन सर्पमित्रांकडून होत आहे.नागपूर शहर व लगतच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्पमित्र

  • श्रीकांत उके (अजनी) - ९८६००३२१२१
  • विश्वजित उके (सक्करदरा नंदनवन) - ९८९०५२२६६०
  • स्वप्निल बोधाने (बेसा, मनीषनगर ) - ९९२३८९१२३०
  • अनिकेत सुरूशे (हुडकेश्वर)- ९५५२६६६६०५
  • भूषण पुजारी (दिघोरी उमरेड रोड) - ७३५०१७५१३६
  • प्रतीक विद्वंस (पिपला रोड) - ७९७२०८३२३०
  • समीर तुंबडे (मानकापूर, गोधनी) - ९७३०६७७७७५
  • कुणाल जरविया (सिव्हिल लाईन, बर्डी) - ७३८५३२८९८७
  • आशिष मेंढे (म्हाळगीनगर)- ८७९३७८३९८४
  • अंकित खलोडे (वाठोडा खरबी) - ९८३४४४५४३६८
  • सतीश जांगडे (पारडी रोड) - ८७९८६०२७८१
  • अभिषेक देवगिरीकर (नरसाळा) - ७२१८९८१२९२
  • सचिन झोडे (बेलतरोडी घोगली)- ९७६५८५९६८७

असा करावा प्रथमोपचारसर्पदंश झाल्यावर रुग्णाच्या शरीरातून हृदयाकडे येणारा रक्तप्रवाह थांबवावा. हृदय उंचावर असेल असे झोपवावे. रुग्णाला कडुलिंबाची पाने खायला देऊ नयेत. पायी चालवू नये. हृदयाकडे रक्तप्रवाह होणार नाही अशा पद्धतीने रिबीन अथवा क्रॅप बँडेज बांधावे आणि तात्काळ रुग्णालयात न्यावे.

टॅग्स :snakeसापnagpurनागपूर