शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

विजयादशमीला रावण दहन बंद करा, आदिवासी संघटनांची मागणी

By मंगेश व्यवहारे | Updated: October 20, 2023 15:03 IST

दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन नको : प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा सुरू आहे. मात्र अलीकडच्या वर्षात आदिवासी संघटनांकडून या प्रथेला विरोध केला जात आहे. यंदा देखील जिल्ह्यातील गोंडवाना गणतंत्र पार्टी, युवा मोर्चा  यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विजयादशमीला रावण दहन प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की, महात्मा गोंडराजे रावण यांचा पुतळा जाळण्याच्या दृष्ट प्रथावर प्रतिबंध लावण्यात यावे. महात्मा राजा रावण हे आदिवासी समाजाचे पुज्यनिय आणि व अत्यंत समृद्ध संस्कृतीचा वैभवशाली वारस्याच्या अविस्मरणीय ठेवा आहे. रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही व यापुढे होणार ही नाही. तामिळनाडूमध्ये महात्मा राजा रावण यांची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मुर्ती ही मध्यप्रदेशातील मंदसौर येथे आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात मेळघाट, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, झारखंड येथे महात्मा राजा रावण यांची पुजा केली जाते. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे. परंतु रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणिवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे.

प्रशासनाने रावणाच्या पुतळ्याच्या दहन करण्याची परवानगी देऊ नये, शासनस्तरावर या प्रथांना बंद करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना दिनेश सिडाम, गंगा टेकाम, शिला मरसकोल्हे, शितल मडावी, मीना कोकुर्डे, उमा सरोते, राकेश उईके, धीरज मसराम, कृष्णा सरोटे, अशोक पोयाम, ज्ञानेश्वर कुभंरे, राजू श्रीरामे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर