शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

परिपूर्ण वृत्तपत्र देण्यासाठी प्रयत्नरत राहू : राजेंद्र दर्डा

By admin | Updated: December 17, 2015 03:16 IST

लोकमान्य टिळक १९१८ साली यवतमाळ येथे आले होते. त्यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात समाजमन तयार करण्यासाठी ...

नागपूर : लोकमान्य टिळक १९१८ साली यवतमाळ येथे आले होते. त्यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात समाजमन तयार करण्यासाठी त्यांनी लोकनायक बापूजी अणे यांना एखादे वृत्तपत्र, साप्ताहिक सुरू करण्याची विनंती केली आणि जनतेचे प्रबोधन करण्याचे सुचविले. १९३३ पर्यंत लोकमत हे साप्ताहिक बापूजी अणे यांनी चालविले. त्यानंतर जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींनी हे साप्ताहिक आणि त्यानंतर अर्ध साप्ताहिक काढले. १९७१ साली त्याचे रुपांतर दैनिकात करण्यात आले. जीव ओतून काम करणाऱ्या आमच्या चमूच्या भरवशावर लोकमत आज वाचकांचे क्रमांक एकचे वृत्तपत्र झाले आहे. यानंतरही भविष्यात सातत्याने परिपूर्ण वृत्तपत्र देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू, असे मत माजी शालेय शिक्षण मंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले. पां. वा. गाडगीळ यांनी सामाजिक-आर्थिक विपुल लेखन केले. परिवर्तनसाठी त्यांनी लेखणी झिजविली. बाबा दळवींनीही शोधप^त्रकारितेच्या माध्यमातून समाजाला जागृत केले. लोकांचे प्रश्न घेऊन त्यांच्यासाठी काम करण्याची परंपरा लोकमतने सांभाळली आहे. १९४२ च्या आंदोलनात बाबूजी कारागृहात गेले. त्यावेळी कारागृहातून बाहेर पडू, असे वाटलेच नाही, असे मत बाबूजींनी व्यक्त केले होते. त्यांनी लोकांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो, असे राजेंद्र दर्डा म्हणाले. सध्या लोकशाहीत अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. लोकशाहीचे धिंडवडे उडत आहेत. विधिमंडळात गोंधळ वाढतो आहे. शासनाने विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे आणि विरोधकांनीही एखाद्या चांगल्या विधेयकाला मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. पण हे घडताना दिसत नाही. त्याशिवाय लोकशाही समृद्ध होणार नाही, असे ते म्हणाले.