शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

घोटाळ्यांच्या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन समितीवर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:50 IST

सरकारी विभागांतील आर्थिक घोटाळ्यांच्या दैनंदिन तपासावर लक्ष ठेवण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यासह अन्य संबंधित वादग्रस्त आदेशांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका जनहित याचिकेमध्ये वादग्रस्त आदेश दिले होते. त्या आदेशांना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय : राज्य सरकारला अंतरिम दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी विभागांतील आर्थिक घोटाळ्यांच्या दैनंदिन तपासावर लक्ष ठेवण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यासह अन्य संबंधित वादग्रस्त आदेशांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका जनहित याचिकेमध्ये वादग्रस्त आदेश दिले होते. त्या आदेशांना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अजय खानविलकर व दीपक गुप्ता यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता वादग्रस्त आदेशांवर अंतरिम स्थगिती दिली. तसेच, जनहित याचिकाकर्ते मधुकर निस्ताने यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. उच्च न्यायालयाने समितीमध्ये आर. सी. चव्हाण (उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती) व के. बी. झिंजर्डे (सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश) यांचा समावेश केला होता. तसेच, या समितीला कामकाज करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावी, समिती सदस्यांना नियमानुसार मानधन देण्यात यावे व सर्व सचिवांनी त्यांच्या विभागांतील घोटाळ्यांची माहिती समितीला द्यावी असे आदेश दिले होते. राज्य सरकारने हे आदेश अमान्य करून ते रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. निशांत काटनेश्वरकर यांनी बाजू मांडली.का स्थापन केली होती समिती?राज्य सरकार घोटाळेबाजांवर वेळीच योग्य कारवाई करीत नाही. बरेचदा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाते. तेव्हापर्यंत महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट होऊन जातात. त्याचा फायदा आरोपींना मिळतो. घोटाळ्यांमुळे सार्वजनिक निधीचे नुकसान होते. घोटाळ्याच्या चौकशीमध्ये सरकारची ऊर्जा व्यर्थ जाते. प्रकरण न्यायालयात आल्यास न्यायव्यवस्थेचा किमती वेळ खर्ची होतो. शेवटी हातात ठोस म्हणावे असे काहीच लागत नाही. असे एक -दोन नाही तर, अनेक प्रकरणांमध्ये झाल्याचे उच्च न्यायालयाला आढळून आले. त्यामुळे उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश दिले होते. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार