शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांच्या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन समितीवर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:50 IST

सरकारी विभागांतील आर्थिक घोटाळ्यांच्या दैनंदिन तपासावर लक्ष ठेवण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यासह अन्य संबंधित वादग्रस्त आदेशांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका जनहित याचिकेमध्ये वादग्रस्त आदेश दिले होते. त्या आदेशांना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय : राज्य सरकारला अंतरिम दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी विभागांतील आर्थिक घोटाळ्यांच्या दैनंदिन तपासावर लक्ष ठेवण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यासह अन्य संबंधित वादग्रस्त आदेशांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका जनहित याचिकेमध्ये वादग्रस्त आदेश दिले होते. त्या आदेशांना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अजय खानविलकर व दीपक गुप्ता यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता वादग्रस्त आदेशांवर अंतरिम स्थगिती दिली. तसेच, जनहित याचिकाकर्ते मधुकर निस्ताने यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. उच्च न्यायालयाने समितीमध्ये आर. सी. चव्हाण (उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती) व के. बी. झिंजर्डे (सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश) यांचा समावेश केला होता. तसेच, या समितीला कामकाज करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावी, समिती सदस्यांना नियमानुसार मानधन देण्यात यावे व सर्व सचिवांनी त्यांच्या विभागांतील घोटाळ्यांची माहिती समितीला द्यावी असे आदेश दिले होते. राज्य सरकारने हे आदेश अमान्य करून ते रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. निशांत काटनेश्वरकर यांनी बाजू मांडली.का स्थापन केली होती समिती?राज्य सरकार घोटाळेबाजांवर वेळीच योग्य कारवाई करीत नाही. बरेचदा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाते. तेव्हापर्यंत महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट होऊन जातात. त्याचा फायदा आरोपींना मिळतो. घोटाळ्यांमुळे सार्वजनिक निधीचे नुकसान होते. घोटाळ्याच्या चौकशीमध्ये सरकारची ऊर्जा व्यर्थ जाते. प्रकरण न्यायालयात आल्यास न्यायव्यवस्थेचा किमती वेळ खर्ची होतो. शेवटी हातात ठोस म्हणावे असे काहीच लागत नाही. असे एक -दोन नाही तर, अनेक प्रकरणांमध्ये झाल्याचे उच्च न्यायालयाला आढळून आले. त्यामुळे उच्च न्यायालयाने वादग्रस्त आदेश दिले होते. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार