शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:17 IST

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नागरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावला मान्यता दली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देराज्य शासनाची मान्यता : पालकमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नागरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावला मान्यता दली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत ही मागणी पूर्ण केली आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. बुटीबोरी ग्रामपंचायतीत बुटीबोरी, रेंगापार, बोरखेडी (फाटक) या गावांचा समवेश होता. ग्रामपंचायत बुटीबोरीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली होती. बुटीबोरी ग्रामपंचायतीनेही नगर परिषदेचा दर्जा देण्याचा ठराव पारित केला आहे. तसेच बुटीबोरी शेजारील कृषिदेव कारखान्याच्या भागाचे मतदान बुटीबोरीत असल्याने तो भागही ग्रामपंचायत बुटीबोरी समाविष्ट करण्यास हरकत नाही, असा ठरावही ग्रामपंचायतीत पारित झाला होता.बुटीबोरी ग्रामपंचायतीची स्थापना १९५८ मध्ये करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये रस्ते, वीज, पाणी, नाली, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत बुटीबोरी क्षेत्राला नगर परिषदेचा दर्जा देण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी ३ आॅगस्ट २०१७ च्या पत्रातून केली आहे.जिल्हाधिकाºयांनी केलेली शिफारस लक्षात घेता बुटीबोरी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३ चे पोटकलम (२) (२ क) (३) च्या तरतुदींची पूर्तता होत असल्याने मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता घेऊन शासनाच्या मान्यतेने २९ हजार लोकसंख्या असलेल्या बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बुटीबोरी नगर परिषदेची रचना होईपर्यंत सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहे.पत्रपरिषदेला आ. समीर मेघे, आ. सुधीर पारवे, आ. गिरीश व्यास, अशोक धोटे, अशोक मानकर, डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे