शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

अरुंधती रॉय यांचा पुतळा जाळला

By admin | Updated: December 30, 2015 03:26 IST

नक्षलवादाला वैचारिक विरोध असण्याचा दावा करणाऱ्या नागपुरातील भूमकाल संघटनेने मंगळवारी बुकर पुरस्कार विजेती लेखिका अरुंधती रॉय यांचा पुतळा दहन केला.

भूमकाल संघटनेची निदर्शनेनागपूर : नक्षलवादाला वैचारिक विरोध असण्याचा दावा करणाऱ्या नागपुरातील भूमकाल संघटनेने मंगळवारी बुकर पुरस्कार विजेती लेखिका अरुंधती रॉय यांचा पुतळा दहन केला. नक्षलवाद्यांचे समर्थन करणाऱ्या अरुंधती रॉय देशद्रोही असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने रॉय यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत त्यांना अवमानना नोटीस बजावली होती.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांना मदत करीत असल्याचा आरोप असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्रा. जी.एन. साईबाबा यांचा जामीन नाकारून त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला मागील वर्षी अटक केली होती. त्यानंतर जून महिन्यात त्यांची जामिनावर सुटका झाली असून ही मुदत ३१ डिसेंबरला संपणार आहे. अरुंधती रॉय यांनी एका प्रतिष्ठित मॅगझीनमध्ये साईबाबांचा जामीन आणि न्यायालयाच्या भूमिकेबाबत आक्षेपार्ह लेख लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर खंडपीठाकडून रॉय यांच्या या लेखाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. न्या.ए.बी. चौधरी यांनी रॉय यांची भाषा अशोभनीय असल्याचे ताशेरे ओढले. रॉय स्वत:ला न्यायालयापेक्षा मोठ्या समजतात का, असा सवाल करीत न्यायालयाने त्यांना अवमानना नोटीस बजावली; सोबतच न्यायालयाने साईबाबाला अटक करण्याचे आदेशही दिले होते. दत्ता शिर्के यांच्या नेतृत्वात मंगळवारी भूमकाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचशील चौकात अरुंधती रॉय यांचा पुतळा दहन करून त्यांचा निषेध केला. नक्षलवादी, काश्मिरी फुटीरवादी यांचे समर्थन करणाऱ्या अरुंधती रॉय आपल्या पेज-३ प्रतिमेचा उपयोग करून देशाची प्रतिमा मलीन करीत असल्याचा आरोप दत्ता शिर्के यांनी यावेळी केला. त्यांचे वर्तन लोकशाही आणि देशविरोधी असून न्यायालयाचा अपमान करणारे आहे, असा आरोपही शिर्के यांनी यावेळी केला. दरम्यान, या घटनेमुळे चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दत्ता शिर्के यांना अटक करून नंतर सुटका केली. (प्रतिनिधी)