शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

राज्याच्या भूजल मूल्यांकनाला दोन वर्षांपासून मान्यताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : राज्याच्या भूजलाचा अभ्यास करून नियोजन सूचविणाऱ्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने (जीएसडीए) दोन वर्षांपूर्वी तयार केलेला ...

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : राज्याच्या भूजलाचा अभ्यास करून नियोजन सूचविणाऱ्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने (जीएसडीए) दोन वर्षांपूर्वी तयार केलेला भूजल मूल्यांकन अहवाल पाणीपुरवठा मंत्रालयात मान्यतेसाठी पडून आहे. या प्रस्तावावरील धूळही झटकली गेली नसताना आता पुन्हा नव्याने अहवाल तयार केला जाणार आहे. जुन्या अहवालाला मंजुरीच मिळाली नसल्याने तो तयार करण्यासाठी भूवैज्ञानिकांनी आणि यंत्रणेने केलेले प्रयत्न वाया गेले आहेत.

इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील प्रकल्प करारानुसार राज्य भूजल एजसीची स्थापना करून भूजलावर आधारित लघु सिंचन योजनांच्या विकासासाठी १९७२ मध्ये राज्य सरकारने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची स्थापन केली. भूजल सर्वेक्षण आणि विकास हेच मुख्य कार्य असलेल्या या यंत्रणेकडून पूर्वी दर चार वर्षांनी राज्याचा भूजल मूल्यांकन अहवाल तयार केला जायचा. मागील काही वर्षांपासून तो दर दोन वर्षांनी तयार केला जातो. २०१९ मध्ये यंत्रणेच्या वैज्ञानिकांनी खपून राज्याचा अहवाल तयार केला होता. यात डार्क वॉटर शेड शोधण्यापासून तर भूजल पातळी, नव्या विंधन विहीर कुठे द्यायच्या, जलपूनर्भरण, उपसा, बोअरवेल, पंप, विहिरी, सिंचन विहीर आदी सूक्ष्म अभ्यास करून अहवाल तयार केला जातो. तो मंजुरीसाठी आणि तांत्रिक तपासणीसाठी सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डाकडे (सीजीडब्ल्यूबी) पाठविला जातो. या बोर्डाकडून जवळपास सहा महिन्यांपर्यंत तांत्रिक तपासणी केली जाते. त्यानंतर तो मंजुरीसाठी राज्याच्या पाणीपुवठा विभागाकडे पाठविला जातो. मंत्रालयाच्या मंजुरीनंतर राज्याचा अहवाल प्रसिद्ध होतो.

यानुसार किमान मागील वर्षी हा अहवाल प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र पाणीपुरवठा मंत्रालयाची मंजुरीच न मिळाल्याने तो अडकला आहे. आता पुन्हा राज्यासाठी २०२१ वर्षांचा नवा मूल्यांकन अहवाल तयार केला जाणार आहे.

...

पाणलोट प्रकल्पांची वर्गवारीच नाही

भूजल मूल्यांकन अहवालाच्या आधारावर राज्यातील पाणलोट प्रकल्पांची वर्गवारी ठरते. त्यांच्या उपश्याच्या टक्केवारीवरून सुरक्षित, अर्धविकसित, विकसित आणि अतिविकसित अशी चार श्रेणीत वर्गवारी केली जाते. २०१७ च्या अहवालानुसार, राज्यात १,५५५, तर नागपूर विभागात २९२ पाणलोट क्षेत्र आहेत. नागपूर विभागात सुरक्षित पाणलोटचे प्रमाण अधिक असले तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र ही संख्या चिंताजनक आहे. २०१९ मधील अहवालातून नव्याने आकडेवारी पुढे आली असती तर, टंचाई निवारणाचे नियोजन करणे सोयीचे झाले असते. मात्र सध्या तरी २०१७च्या अहवालानुसारच राज्यात काम सुरू आहे.

...