शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

राज्याच्या भूजल मूल्यांकनाला दोन वर्षांपासून मान्यताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : राज्याच्या भूजलाचा अभ्यास करून नियोजन सूचविणाऱ्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने (जीएसडीए) दोन वर्षांपूर्वी तयार केलेला ...

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : राज्याच्या भूजलाचा अभ्यास करून नियोजन सूचविणाऱ्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने (जीएसडीए) दोन वर्षांपूर्वी तयार केलेला भूजल मूल्यांकन अहवाल पाणीपुरवठा मंत्रालयात मान्यतेसाठी पडून आहे. या प्रस्तावावरील धूळही झटकली गेली नसताना आता पुन्हा नव्याने अहवाल तयार केला जाणार आहे. जुन्या अहवालाला मंजुरीच मिळाली नसल्याने तो तयार करण्यासाठी भूवैज्ञानिकांनी आणि यंत्रणेने केलेले प्रयत्न वाया गेले आहेत.

इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील प्रकल्प करारानुसार राज्य भूजल एजसीची स्थापना करून भूजलावर आधारित लघु सिंचन योजनांच्या विकासासाठी १९७२ मध्ये राज्य सरकारने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची स्थापन केली. भूजल सर्वेक्षण आणि विकास हेच मुख्य कार्य असलेल्या या यंत्रणेकडून पूर्वी दर चार वर्षांनी राज्याचा भूजल मूल्यांकन अहवाल तयार केला जायचा. मागील काही वर्षांपासून तो दर दोन वर्षांनी तयार केला जातो. २०१९ मध्ये यंत्रणेच्या वैज्ञानिकांनी खपून राज्याचा अहवाल तयार केला होता. यात डार्क वॉटर शेड शोधण्यापासून तर भूजल पातळी, नव्या विंधन विहीर कुठे द्यायच्या, जलपूनर्भरण, उपसा, बोअरवेल, पंप, विहिरी, सिंचन विहीर आदी सूक्ष्म अभ्यास करून अहवाल तयार केला जातो. तो मंजुरीसाठी आणि तांत्रिक तपासणीसाठी सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डाकडे (सीजीडब्ल्यूबी) पाठविला जातो. या बोर्डाकडून जवळपास सहा महिन्यांपर्यंत तांत्रिक तपासणी केली जाते. त्यानंतर तो मंजुरीसाठी राज्याच्या पाणीपुवठा विभागाकडे पाठविला जातो. मंत्रालयाच्या मंजुरीनंतर राज्याचा अहवाल प्रसिद्ध होतो.

यानुसार किमान मागील वर्षी हा अहवाल प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र पाणीपुरवठा मंत्रालयाची मंजुरीच न मिळाल्याने तो अडकला आहे. आता पुन्हा राज्यासाठी २०२१ वर्षांचा नवा मूल्यांकन अहवाल तयार केला जाणार आहे.

...

पाणलोट प्रकल्पांची वर्गवारीच नाही

भूजल मूल्यांकन अहवालाच्या आधारावर राज्यातील पाणलोट प्रकल्पांची वर्गवारी ठरते. त्यांच्या उपश्याच्या टक्केवारीवरून सुरक्षित, अर्धविकसित, विकसित आणि अतिविकसित अशी चार श्रेणीत वर्गवारी केली जाते. २०१७ च्या अहवालानुसार, राज्यात १,५५५, तर नागपूर विभागात २९२ पाणलोट क्षेत्र आहेत. नागपूर विभागात सुरक्षित पाणलोटचे प्रमाण अधिक असले तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र ही संख्या चिंताजनक आहे. २०१९ मधील अहवालातून नव्याने आकडेवारी पुढे आली असती तर, टंचाई निवारणाचे नियोजन करणे सोयीचे झाले असते. मात्र सध्या तरी २०१७च्या अहवालानुसारच राज्यात काम सुरू आहे.

...