शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात विदर्भ राज्याचा विचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:21 IST

सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येत आहे. वेगळ्या विदर्भाबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून त्याचाही निर्णय करू, असे सकारात्मक आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनामा विभागाचे समन्वयक खासदार प्रो. राजीव गौडा यांनी येथे दिले.

ठळक मुद्देनागरिकांच्या सूचना : खासदार राजीव गौडा यांचे सकारात्मक आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येत आहे. वेगळ्या विदर्भाबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून त्याचाही निर्णय करू, असे सकारात्मक आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनामा विभागाचे समन्वयक खासदार प्रो. राजीव गौडा यांनी येथे दिले.लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार पक्षाने तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी आवश्यक जाहीरनामा तयार करण्यासाठी ‘जन आवाज’च्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची मते जाणून घेण्यात येत आहेत. नागपुरातील प्रेस क्लब येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात याची सुरुवात करण्यात आली. यावेळी अमोल देशमुख, हर्षवर्धन निकोसे, डॉ. सुचिता देशमुख उपस्थित होते.यावेळी गौडा यांनी व्यापारी, पत्रकार, उद्योजकांसोबत सामान्य नागरिकाशी जाहीरनाम्याबाबत चर्चा केली. गौडा यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांची मते जाणून घेतल्यावरच जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. यासाठी २० लोकांची एक टीम तयार करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांच्या सूचनांच्या आधारे जाहीरनामा तयार करून तोच जनतेपुढे मांडण्यात येणार आहे. जीएसटी आणि नोटाबंदीने छोटे व्यापारी आणि अर्थव्यवस्थेचे मोठ नुकसान केल्याची टीका त्यांनी केली. व्यापारी, उद्योजकांनी विदर्भातील उद्योगासंदर्भात विशेष लक्ष घालून त्याच्या भरभराटीसाठी सवलती देण्याच्या सूचना केली. काहींनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यात समावेश करण्याची सूचना केली. यावर बोलताना गौडा म्हणाले, एक भाषेचे एक राज्य असावे, अशी भावना होती. आंध्रप्रदेशचे दोन राज्य झाले. वेगळ्या विदर्भाबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून यावर सकारात्मक विचार करण्यात येईल. भाजप हिंदुराष्ट्र, मनुवादी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्नात आहे. मुस्लीम, दलितांवर अत्याचार होत आहेत. दलित, मुस्लिमांच्या हितांचे रक्षण काँग्रेसतर्फे करण्यात येईल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी ग्रामपंचायतींमध्ये विजयी झालेले काँग्रेसचे सरपंच आणि सदस्यांना गौरव करण्यात आला.

टॅग्स :Vidarbhaविदर्भcongressकाँग्रेस