शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी CBI ची कारवाई!
2
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
3
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
4
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
5
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
6
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
7
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
8
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
9
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
10
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
11
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
12
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
13
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
14
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
15
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
16
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
17
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
18
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
19
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
20
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र

राज्याचे स्वतंत्र ‘वन्यजीव धोरण’ हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 10:56 IST

wildlife Nagpur News राज्यातील वन्यजीवांसमोरील आजची आणि भविष्यातील आवाहने पेलण्याच्या दृष्टीने राज्याचे स्वतंत्र वन्यजीव धोरण असावे, अशी आग्रही मागणी राज्य वन्यजीव मंडळ सल्लागार बैठकीच्या निमित्ताने पुढे आली आहे.

ठळक मुद्देवन धोरणात व्यापकता नाही वन्यजीव व जैवविविधता संवर्धनाला वाव नाही, बंडू धोतरे यांची खंत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्याचे वन धोरण २००८ मध्ये तयार झाले. या धोरणामुळे वन व्यवस्थापनाला आणि विकासाला दिशा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. वन्यजीव व जैवविविधता संवर्धनासंदर्भातील महत्त्वाचा मुद्दा तर केवळ दोन उताऱ्यातच संपविण्यात आला. त्यात व्यापक धोरण समाविष्ट नाही. त्यामुळे राज्यातील वन्यजीवांसमोरील आजची आणि भविष्यातील आवाहने पेलण्याच्या दृष्टीने राज्याचे स्वतंत्र वन्यजीव धोरण असावे, अशी आग्रही मागणी राज्य वन्यजीव मंडळ सल्लागार बैठकीच्या निमित्ताने पुढे आली आहे.

या समितीचे सदस्य बंडू धोतरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून ही मागणी केली आहे. हे धोरण आखण्याच्या दृष्टीने त्यांनी उपाययोजना, आराखडे व नियोजनही सुचविले आहेत. पूर्वी राजे-महाराजांच्या काळात जंगलात शिकार करणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जायची. ब्रिटिशकाळातही अधिकाऱ्यांचा हा शौक होता. ब्रिटिशकाळात इंग्रज सरकारने ‘वन अधिनियम-१८६५’ लागू केला. शिकारीसाठी खास क्षेत्र म्हणजे ‘शुटींग ब्लाॅक’ घोषित करण्यात आले होते. महाराष्ट्रात सुध्दा अनेक ठिकाणी १८६० ते १८८० या काळात अशी वनक्षेत्रे घोषित होती. नंतरच्या काळात ‘भारतीय वन अधिनियम १९७२’ आल्यानंतर सुध्दा ‘शुटींग ब्लाॅक’ अस्तित्चात होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही शुटींग ब्लाॅकमध्ये देश-विदेशातील शिकारी येत असत. मात्र १९७२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे संकटग्रस्त स्थितीत पोहचलेल्या वाघांना हक्काचे अधिवास संरक्षण, त्यांचे प्रजनन योग्य व्हावे म्हणून प्रोजेक्ट टायगर संकल्पना समोर आणली. यामुळेच आज व्याघ्र संवर्धनाबाबत चांगले चित्र देशात निर्माण होऊ शकले आहे.

आज वन्यजीव विभागाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील एक-दोन दशकात राज्यात वन्यजीव व्यवस्थापन दृष्टीने काही प्रमाणात बदल दिसत आहे. एकीकडे विकास साधत असतानाही लोकसंख्या, वन्यप्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण आदींमुळे वन्यजीव संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने आव्हाने वाढत आहेत, मात्र त्या प्रमाणात व्यापक नियोजन होत नाही. त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मत या पत्रातून व्यक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव