शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

राज्यातील मंत्रीच बोगस ओबीसी प्रमाणपत्र वाटपात सामील; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

By गणेश हुड | Updated: September 20, 2025 20:38 IST

Nagpur : ५० लाख लोकांची ओबीसीमध्ये घुसखोरी?

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासंदर्भात नव्या वादाला सुरुवात झाली असून, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते  विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील काही मंत्र्यांच्याच सहभागाने बोगस ओबीसी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप  शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

वडेट्टीवार म्हणाले, “ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, अशा मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. परंतु २ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी, भटक्या-विमुक्त (व्हीजेएनटी) आणि एसबीसी प्रवर्गातील आरक्षण धोक्यात आले आहे. हा जीआर म्हणजे ओबीसींच्या हक्कावर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा असून, ओबीसी समाजाला नामशेष करण्यासाठी रचलेला घातक कट आहे.”

त्यांनी सांगितले की, निजामकालीन हैद्राबाद गॅझेटनुसार ज्यांच्या शेतीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता आहे. परंतु जीआरनुसार सध्या ‘बैलपोळा साजरा करता का?’, ‘कुलदैवत कोणते?’ अशा प्रश्नांच्या आधारे प्रमाणपत्रे वाटली जात आहेत. “प्रत्येक तहसीलदाराला महिन्याभरात किमान हजार दाखले देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा पद्धतीने तब्बल ५० लाख लोकांची ओबीसीमध्ये बेकायदेशीर घुसखोरी होणार आहे,” आजवर किती बोगस ओबीसी प्रमाणपत्रे वाटली गेली, याची संपूर्ण श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी,” अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.  यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, हुकूमचंद आमदरे, सुरेश गुडधे, प्रवीण कुंटे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भुजबळांवर देशमुखांची टीका

यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले, “मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांविषयी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. भुजबळ मंत्रिमंडळात असूनही ओबीसींवर अन्याय होत आहे. त्यांनी कॅबिनेटमध्येच आवाज उठवायला हवा होता; परंतु ते बाहेर बोलतात. शरद पवारांनीच मंडळ आयोगाला समर्थन दिले होते, त्यासाठीच भुजबळांनी शिवसेना सोडली होती.” देशमुखांनी पुढे स्पष्ट केले की, “मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. परंतु त्यासाठी इतर समाजांच्या हक्कांवर गदा येणार असेल, तर तो आम्हाला मान्य नाही. त्यामुळे २ सप्टेंबरचा जीआर तातडीने रद्द करण्यात यावा.”

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBC Reservationओबीसी आरक्षणPoliticsराजकारण