शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार टाइमपास करतेय : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 21:02 IST

Devendra Fadnavis, Maratha reservation राज्य सरकार प्रत्येक गोष्टीबाबत केंद्राकडे बोट दाखवते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. परंतु यासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकार टाईमपास करीत आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.

ठळक मुद्देपुनर्विचार याचिका दाखल करण्याची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकार प्रत्येक गोष्टीबाबत केंद्राकडे बोट दाखवते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. परंतु यासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकार टाईमपास करीत आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.

शुक्रवारी नागपुरात आले असता फडणवीस विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, संविधानाच्या कलम १०२ मध्ये संशोधन केल्यानंतर केंद्र सरकारने हे स्पष्ट केले होते की, कुठल्याही समाजाला मागास घोषित करण्याचा अधिकार राज्याकडेच राहील. परंतु सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात यासंदर्भात एकमत झाले नाही. पाचपैकी तीन न्यायाधीशांनी सांगितले की, हा अधिकार केंद्राकडे आहे. केंद्राचे म्हणणे आहे की, हा अधिकार राज्याकडे आहे. याबाबतच केंद्राने याचिका दाखल करून त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षण हे राज्य सरकारच्या कायद्यानुसार देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण ५० टक्केपेक्षा अधिक असल्याच्या कारणावरून मराठा आरक्षण रद्द केले आहे. हे आरक्षण राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे राज्य सरकारलाच आरक्षणासाठी याचिका दाखल करावी लागेल. परंतु राज्य सरकार नाटकबाजी करीत आहे. ते हा विषय केंद्र सरकारकडे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून संविधानाच्या कलम १०२ बाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण