शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

राज्य सरकारला हायकोर्टात दहा लाख जमा करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 20:13 IST

अवैध उत्खनन प्रकरणात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना भेदभावपूर्ण भूमिका ठेवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यामुळे राज्य सरकारला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दहा लाख रुपये जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला. रक्कम जमा करण्यासाठी चार आठवड्याची मुदत देण्यात आली. या आदेशामुळे सरकारला जोरदार दणका बसला.

ठळक मुद्देजोरदार दणका : अवैध उत्खनन प्रकरणातील कारवाईत भेदभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध उत्खनन प्रकरणात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना भेदभावपूर्ण भूमिका ठेवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यामुळे राज्य सरकारला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दहा लाख रुपये जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला. रक्कम जमा करण्यासाठी चार आठवड्याची मुदत देण्यात आली. या आदेशामुळे सरकारला जोरदार दणका बसला.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा आदेश दिला. तसेच, पुढच्या तारखेला भेदभावपूर्ण कारवाईवर विस्तृत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले. गेल्या ५ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार वन विभागाचे मुख्य सचिव न्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित झाले होते. सुनावणीदरम्यान, सरकारने विविध कागदपत्रे सादर करून स्वत:ला निष्कलंक सिद्ध करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, प्रकरणातील तथ्ये सरकारच्या भेदभावपूर्ण कारवाईकडे बोट दाखवित होते. ते पाहता न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली व १० लाख रुपये जमा करून प्रामाणिकता सिद्ध करण्याचा आदेश दिला.उत्तर उमरेड भागातील पाचगाव वनक्षेत्रात २००२ ते २०१२ या कालावधीत गिट्टीचे अवैध उत्खनन झाले. त्यामुळे सरकारचा २ कोटी ७५ लाख ३४ हजार रुपयांचा महसूल बुडाला. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. तसेच, ६ मे २०१५ रोजी उच्च न्यायालयाने अन्य एका याचिकेमध्ये या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला. त्यामुळे सहायक वनरक्षक राजेश चोपकर यांनी १० आॅगस्ट २०१५ रोजी कुही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४०९, ३७९, ३४ व भारतीय वन कायद्याच्या कलम ३२ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. आरोपींपैकी वनपाल एल.यू. शेंडे व डी.जी. पवार यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात सरकारच्या भेदभावपूर्ण कारवाईची माहिती देण्यात आली. परिणामी, न्यायालयाने हे प्रकरण जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा तर, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी बाजू मांडली.असा केला भेदभावउपवनसंरक्षक डॉ. दिलीप गुजर हे प्रकरणात आरोपी होते. ते ३१ आॅक्टोबर २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला नाही. परंतु, त्यांच्यापूर्वी म्हणजे, जानेवारी-२००६ मध्ये सेवानिवृत्त झालेले याचिकाकर्ते शेंडे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. कारवाईतील हा भेदभाव सरकारच्या अंगलट आला आहे.लोकशाहीवरील विश्वासाला तडेनागरिकांचा लोकशाहीवर विश्वास आहे. परंतु, सरकारी अधिकारी या विश्वासाला तडे देण्याची कृती करीत आहेत. हे अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे असे मत न्यायालयाने आदेशात व्यक्त करून सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार