शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नागपूर विभागातील रेल्वेच्या 30 रेल्वे स्थानकांच्या मेकओव्हरला प्रारंभ

By नरेश डोंगरे | Updated: August 4, 2023 19:53 IST

पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी शिलान्यास : अमृत भारत स्टेशन योजना : ५५२.७ कोटींचा होईल खर्च : प्रवाशांना मिळणार हक्काच्या चांगल्या सोयी-सुविधा.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत मध्य रेल्वेच्या १५ आणि दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या १५ रेल्वेस्थानकांच्या अंत:बाह्य नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ रविवारी, ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांचा शिलान्यास व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून रविवारी करणार आहेत. त्यात मध्य आणि दपूम रेल्वेच्या क्षेत्रातील ३० रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या संबंधाची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी गुरुवारी तर दपूम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी आज शुक्रवारी पत्रकारांना दिली.

रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ही योजना अंमलात आणली जात आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील घोडाडोंगरी, बैतूल, आमला, जुन्नारदेव, मुलताई, पांढूर्णा, नरखेड, काटोल, गोधनी, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, चंद्रपूर आणि बल्लारशाह या रेल्वेस्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कायापालट होणार आहे. त्यासाठी ३७२.७ कोटी रुपये खर्च केला जाणार असून, प्रत्येक स्थानकावर १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रीज, आकर्षक प्रवेश द्वार, पार्किंग, एप्रोचरोड आतमध्ये प्रवाशांना फलाटावर प्रशस्त जागा आणि वेटिंग हॉल, लिफ्ट, एस्केलेटर, इलेक्ट्रॉनिक कोच इंडिकेशन बोर्ड, स्वच्छतागृह आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचेही पांडे यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव तसेच जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत पगारे, अमोल गहूकर, समन्वयक राजेश चिखले उपस्थित होते.वडसा, गोंदिया आणि चांदा फोर्ट

दपूम रेल्वेच्या क्षेत्रातील १५ स्थानकांवर या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. १५ पैकी वडसा (देसाईगंज), गोंदिया आणि चांदा फोर्ट या रेल्वेस्थानकांचा शिलान्यास रविवारी होईल, असे त्रिपाठी म्हणाल्या. यावेळी एकेडीआरएम ए. के. सूर्यवंशी, गती शक्ती युनिटचे प्रकल्प प्रमूख महावल प्रसाद तसेच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दीपक कुमार उपस्थित होते.५० वर्षांचा मास्टर प्लॅन

अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत ५० वर्षांचा मास्टर प्लॅन रेल्वे बोर्डाने तयार केला आहे. त्यामुळे केवळ आता साैंदर्यीकरण केले आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष केले, असे होणार नाही. तर, प्रदीर्घ काळापर्यंत त्याची चांगली देखभाल करण्याचीही योजना आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात नमिता त्रिपाठी यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे