शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

नागपूर विभागातील रेल्वेच्या 30 रेल्वे स्थानकांच्या मेकओव्हरला प्रारंभ

By नरेश डोंगरे | Updated: August 4, 2023 19:53 IST

पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी शिलान्यास : अमृत भारत स्टेशन योजना : ५५२.७ कोटींचा होईल खर्च : प्रवाशांना मिळणार हक्काच्या चांगल्या सोयी-सुविधा.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत मध्य रेल्वेच्या १५ आणि दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या १५ रेल्वेस्थानकांच्या अंत:बाह्य नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ रविवारी, ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांचा शिलान्यास व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून रविवारी करणार आहेत. त्यात मध्य आणि दपूम रेल्वेच्या क्षेत्रातील ३० रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या संबंधाची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी गुरुवारी तर दपूम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी आज शुक्रवारी पत्रकारांना दिली.

रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ही योजना अंमलात आणली जात आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील घोडाडोंगरी, बैतूल, आमला, जुन्नारदेव, मुलताई, पांढूर्णा, नरखेड, काटोल, गोधनी, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, चंद्रपूर आणि बल्लारशाह या रेल्वेस्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कायापालट होणार आहे. त्यासाठी ३७२.७ कोटी रुपये खर्च केला जाणार असून, प्रत्येक स्थानकावर १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रीज, आकर्षक प्रवेश द्वार, पार्किंग, एप्रोचरोड आतमध्ये प्रवाशांना फलाटावर प्रशस्त जागा आणि वेटिंग हॉल, लिफ्ट, एस्केलेटर, इलेक्ट्रॉनिक कोच इंडिकेशन बोर्ड, स्वच्छतागृह आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचेही पांडे यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव तसेच जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत पगारे, अमोल गहूकर, समन्वयक राजेश चिखले उपस्थित होते.वडसा, गोंदिया आणि चांदा फोर्ट

दपूम रेल्वेच्या क्षेत्रातील १५ स्थानकांवर या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. १५ पैकी वडसा (देसाईगंज), गोंदिया आणि चांदा फोर्ट या रेल्वेस्थानकांचा शिलान्यास रविवारी होईल, असे त्रिपाठी म्हणाल्या. यावेळी एकेडीआरएम ए. के. सूर्यवंशी, गती शक्ती युनिटचे प्रकल्प प्रमूख महावल प्रसाद तसेच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दीपक कुमार उपस्थित होते.५० वर्षांचा मास्टर प्लॅन

अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत ५० वर्षांचा मास्टर प्लॅन रेल्वे बोर्डाने तयार केला आहे. त्यामुळे केवळ आता साैंदर्यीकरण केले आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष केले, असे होणार नाही. तर, प्रदीर्घ काळापर्यंत त्याची चांगली देखभाल करण्याचीही योजना आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात नमिता त्रिपाठी यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे