शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:04 IST

बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी धावपळ उडते. कार्यालयात विद्यार्थ्यांची अचानक गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ऐन प्रवेशाच्या तोंडावर ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शुक्रवारपासून जात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देनागपूर समितीचा पुढाकार : ७०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी धावपळ उडते. कार्यालयात विद्यार्थ्यांची अचानक गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ऐन प्रवेशाच्या तोंडावर ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शुक्रवारपासून जात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरचे उपायुक्त व सदस्य आर. डी. आत्राम यांच्या पुढाकाराने ७०० विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, ओबीसी व एसबीसी जातीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महसूल उपायुक्त के. एन. के. राव, सहाय्यक आयुक्त विजय वाकुडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, हंसराज गोहते, गोपाल वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आर.डी. आत्राम म्हणाले की, दरवर्षी नागपूर समितीकडून २० हजाराच्या जवळपास जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते. यात १२ हजार प्रमाणपत्र बारावीच्या विद्यार्थ्यांचे असते. तर पाच हजाराच्या जवळपास अभियांत्रिकीला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे असते. तर ३००० च्या जवळपास नोकरी व निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते. यावर्षी समितीकडे २० ते २२ हजाराच्या जवळपास अर्ज आले आहे. काही प्रकरणात असलेल्या त्रुटी वगळता ८० टक्के प्रमाणपत्राचे काम झाले आहे. सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून आज ७०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. दरवर्षी निकालानंतर विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता, यावर्षी परीक्षा संपल्यानंतरच प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रnagpurनागपूर