शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पोलीस कुटुंबीयांना लाभणार स्थैर्य

By admin | Updated: May 31, 2014 00:55 IST

एकाच ठिकाणी दोन वर्षे सेवा देणारे पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे धोरण शासनाने ठरविले होते. त्यात शासनाने सुधारणा केली आहे. यामुळे किमान ६ वर्षे तरी

दिलासा : दर दोन वर्षांनी बदलीच्या निर्णयाला शासनाची स्थगितीअमरावती : एकाच ठिकाणी दोन वर्षे सेवा देणारे पोलीस शिपाई ते सहायक पोलीस  उपनिरीक्षकांच्या बदलीचे धोरण शासनाने ठरविले होते. त्यात शासनाने सुधारणा केली आहे.  यामुळे किमान ६ वर्षे तरी पोलीस कर्मचार्‍यांना एकाच ठिकाणी राहता येणार आहे. शासनाच्या या  धोरणात्मक निर्णयामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनाही स्थैर्य लाभणार आहे.पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांबाबत सर्वसाधारण धोरण निश्‍चित  करण्यात आले होते. पोलीस शिपायांच्या नेमणुकीनंतर प्रशिक्षण व मुख्यालयातील ३ वर्षांचा सेवा  कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची मुख्यालयातून  अन्यत्र बदली करण्यात येत होती. ज्या पोलीस कर्मचार्‍यांचा एका पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला असेल  त्यांना त्याच उपविभागाच्या परिमंडळातील दुसर्‍या पोलीस ठाण्यात बदलीवर पाठविण्याचा निर्णय  घेण्यात आला. उपविभाग किंवा परिमंडळात चार वर्षांचा  व सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी  दोन वर्षे पूर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांना अन्य पोलीस ठाणे, मुख्यालय, घटक, शाखा या ठिकाणी  बदलीवर पाठविण्याचा निर्णय ७ एप्रिल २0१४ रोजी शासनाने घेतला. या निर्णयाविरोधात पोलीस व अधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच या निर्णयामुळे पोलीस  कर्मचार्‍यांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार होते. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस  अधिनियम १९५१ मध्ये सुधारणा अध्यादेश २0१४ नुसार बदली नियमात सुधारणा करण्यात  आली आहे. तसेच या अध्यादेशात काही दुरूस्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे या सुधारणा  होईस्तोवर केवळ पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या पूर्वीच्याच  धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या नियमांच्या कार्यपद्धतीनुसार करण्यात याव्यात, असे आदेश  पोलीस महासंचालक (आस्थापना) यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे पोलीस कर्मचार्‍यांच्या  कुटुंबांना स्थैर्य लाभणार आहे.  (प्रतिनिधी)