शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

पोलीस कुटुंबीयांना लाभणार स्थैर्य

By admin | Updated: May 31, 2014 00:55 IST

एकाच ठिकाणी दोन वर्षे सेवा देणारे पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे धोरण शासनाने ठरविले होते. त्यात शासनाने सुधारणा केली आहे. यामुळे किमान ६ वर्षे तरी

दिलासा : दर दोन वर्षांनी बदलीच्या निर्णयाला शासनाची स्थगितीअमरावती : एकाच ठिकाणी दोन वर्षे सेवा देणारे पोलीस शिपाई ते सहायक पोलीस  उपनिरीक्षकांच्या बदलीचे धोरण शासनाने ठरविले होते. त्यात शासनाने सुधारणा केली आहे.  यामुळे किमान ६ वर्षे तरी पोलीस कर्मचार्‍यांना एकाच ठिकाणी राहता येणार आहे. शासनाच्या या  धोरणात्मक निर्णयामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनाही स्थैर्य लाभणार आहे.पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांबाबत सर्वसाधारण धोरण निश्‍चित  करण्यात आले होते. पोलीस शिपायांच्या नेमणुकीनंतर प्रशिक्षण व मुख्यालयातील ३ वर्षांचा सेवा  कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची मुख्यालयातून  अन्यत्र बदली करण्यात येत होती. ज्या पोलीस कर्मचार्‍यांचा एका पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला असेल  त्यांना त्याच उपविभागाच्या परिमंडळातील दुसर्‍या पोलीस ठाण्यात बदलीवर पाठविण्याचा निर्णय  घेण्यात आला. उपविभाग किंवा परिमंडळात चार वर्षांचा  व सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी  दोन वर्षे पूर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांना अन्य पोलीस ठाणे, मुख्यालय, घटक, शाखा या ठिकाणी  बदलीवर पाठविण्याचा निर्णय ७ एप्रिल २0१४ रोजी शासनाने घेतला. या निर्णयाविरोधात पोलीस व अधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच या निर्णयामुळे पोलीस  कर्मचार्‍यांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार होते. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस  अधिनियम १९५१ मध्ये सुधारणा अध्यादेश २0१४ नुसार बदली नियमात सुधारणा करण्यात  आली आहे. तसेच या अध्यादेशात काही दुरूस्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे या सुधारणा  होईस्तोवर केवळ पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या पूर्वीच्याच  धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या नियमांच्या कार्यपद्धतीनुसार करण्यात याव्यात, असे आदेश  पोलीस महासंचालक (आस्थापना) यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे पोलीस कर्मचार्‍यांच्या  कुटुंबांना स्थैर्य लाभणार आहे.  (प्रतिनिधी)