शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एसटी कर्मचारी म्हणाले, आम्ही झुकणार नाही; कामावर परतण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 13:13 IST

नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर बैठकीचे आयोजन केले. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर कोणीही कर्मचारी कामावर परत जाणार नाही,असा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देशासनाने दिली कारवाई मागे घेण्याची ऑफर

नागपूर : कोणत्याही परिस्थितीत एसटीचे शासनात विलीनीकरण शक्य नाही असा निर्णय शासनाने दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई सुद्धा परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० मार्चपर्यंत कामावर परतल्यास कारवाई मागे घेण्यात येणार आहे. परंतू कोणत्याही परिस्थितीत आम्ही झुकणार नसून आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू त्यानंतर आमची भूमिका ठरवू असा पावित्रा संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर बैठकीचे आयोजन केले. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर कोणीही कर्मचारी कामावर परत जाणार नाही,असा निर्णय घेण्यात आला. अंतिम टप्प्यात आता न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संपाबाबत तीन सदस्यीय समितीने विलीनीकरणाची मागणी नाकारली आहे. त्यामुळे समितीचा अहवाल योग्य असल्याचे सांगून शासनाने सुद्धा विलीनीकरणास नकार दिला आहे.

कामावर परतल्यास कारवाई होणार नाही

‘कामावर रुजू होण्यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांना सात दिवसांचा वेळ दिला आहे. कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आधी केलेली कारवाई मागे घेण्यात येईल. परंतू कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुढील रस्ता नेहमीसाठी बंद होईल.’

-नीलेश बेलसरे,विभाग नियंत्रक,एसटी महामंडळ,नागपूर विभाग

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportएसटीEmployeeकर्मचारी