शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सृष्टीचा कन्याकुमारी ते श्रीनगर पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 14:31 IST

सृष्टी बक्षी या महिला सशक्तीकरणासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३८०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहे. १७८० किलोमीटरचा प्रवास करून त्या गुरुवारी नागपुरात पोहचल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आपल्या अभियानाचा उद्देश व आलेले अनुभव शेअर केले.

ठळक मुद्देमहिला सशक्तीकरणासाठी साहसिक प्रयत्न : लैंगिक समानतेसाठी अभियान

आॅनलाईन लोकमतनागपूर : आज पुरुषांच्या तुलनेत महिला फार मागे आहे. देशाच्या खेड्यापाड्यात महिलांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांचा आवाजाच दाबला गेला आहे. चूल आणि मूल हीच संस्कृती आजही खेड्यांमध्ये बघायला मिळते. देशातील ग्रामीण भागात लैंगिक समानतेची गरज असल्याचे सृष्टी बक्षी म्हणाल्या. सृष्टी बक्षी या महिला सशक्तीकरणासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३८०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहे. १७८० किलोमीटरचा प्रवास करून त्या गुरुवारी नागपुरात पोहचल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आपल्या अभियानाचा उद्देश व आलेले अनुभव शेअर केले.देशभरात महिला सुरक्षेचा असलेला प्रश्न, ‘आय एम चेंज मेकर’, आपल्या हक्काची जाणीव, आर्थिक व संगणक साक्षरता, स्वच्छता, सॅनिटेशन, नेतृत्वक्षमता याबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘क्रॉसबो माईल्स’ मोहिमेच्या माध्यमातून सृष्टी बक्षी यांनी पदयात्रा सुरू केली आहे. २६० दिवसात त्या ३८०० किमी पायी प्रवास करून एप्रिलपर्यंत श्रीनगरमध्ये दाखल होणार आहे. या दरम्यान ठिकठिकाणी कार्यशाळा घेण्यात येत असून महिलांना आपल्या हक्काची जाणीव करून दिली जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल, यासाठी मार्गदर्शन देण्यात येत आहे. देशाला महिलांसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित बनविण्याच्या वाटचालीसाठी जागृतीचे दमदार पाऊल टाकणार, असा निर्धार सृष्टी बक्षीने पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केला. १७००० लोकांशी साधला संवादसृष्टीने आपल्या मोहिमेद्वारे मागील १०३ दिवसात १७ हजार लोकांशी संवाद साधला. यात विद्यार्थी, शिक्षक, जिल्हाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राज्य पोलिसांचा समावेश आहे. महिलांचे शिक्षण, सक्षमीकरण या दृष्टीने महिला व मुलींसाठी मोहीम फायदेशीर ठरल्याचा विश्वास व्यक्त केला. या दरम्यान अनेक शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. सर्वत्र महिलांच्या सारख्या समस्या१५ सप्टेंबर २०१७ रोजी कन्याकुमारी येथून पदयात्रेला सुरुवात झाल्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा होत महाराष्ट्रात दाखल झाल्या. या दरम्यान सर्व ठिकाणी महिलांच्या समस्या काही प्रमाणात सारख्या आढळून आल्यात. त्यात म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव, स्वत:च्या क्षमतेविषयी असणाऱ्या जाणिवेची कमतरता, मुलींसाठी शिक्षणाच्या संधीचा अभाव, हुंडाबळी, दारू आणि कौटुंबिक हिंसाचार आदी समस्या असून त्यावरील उपाययोजनांचा शोध घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या समस्या मांडणार सरकारकडेसृष्टीच्या या अभियानाला गुगल व टाटा ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे. कार्यशाळेत महिलांनी मांडलेल्या व्यथा, अनुभव त्या आपल्या वेबसाईटवर टाकणार आहे. आलेल्या अनुभवांचा एक सखोल अहवाल तयार करून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय उपाययोजना करता येऊ शकते, यासाठी सरकारला अहवाल सादर करणार आहे.

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSportsक्रीडा