शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 10:08 IST

मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती इतकी संथ आहे की, ४६ योजनांचा आराखडा तयार झाल्यानंतरही २०१८-१९ या वर्षात केवळ २८ योजनांचे कार्यारंभ आदेश मिळू शकले.

ठळक मुद्दे४६ पैकी २८ योजनाच मार्गीएक वर्ष नुसते आढावा घेण्यात गेले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीव्र पाणीटंचाई भेडसावत असलेल्या गावांसाठी गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री पेयजल योजना अमलात आणली. परंतु या योजनेच्या कामाची गती इतकी संथ आहे की, ४६ योजनांचा आराखडा तयार झाल्यानंतरही २०१८-१९ या वर्षात केवळ २८ योजनांचे कार्यारंभ आदेश मिळू शकले.राष्ट्रीय पेयजल योजनेमधील प्रकल्प राबविताना केंद्राचा निधी उशिरा मिळत असल्याने कामांना ब्रेक लागायचा़ त्यामुळे राज्य शासनाने आपल्या हक्काच्या निधीचा वापर करीत मुख्यमंत्री पेयजल योजना अमलात आणली़ परंतु दोन वर्षांपासून ही योजना कागदावरून पुढे सरकायचे नाव घेत नाही़त्यामुळे या योजनेची कमालीची कासवगती असल्याचे पहायला मिळते आहे़ २०१५-१६ या वर्षात ही योजना लागू करण्यात आली़ सुरुवातीच्या वर्षात तीव्र टंचाईयुक्त गावांची यादी तयार करून ती शासनाच्या पाणीपुरवठा खात्याला सादर करण्यात आली़ अंदाजपत्रकीय मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झालेत़ परंतु काही ग्रामपंचायतने ही योजना राबविण्यासाठी नकार दिल्याने ग्रामपंचायत ठरावच पाणीपुरवठा विभागाला अप्राप्त होते़ त्यामुळे २०१६-१७ हे वर्ष नुसते या योजनांचा आढावा आणि कागदी दस्ताऐवजांचा पाठपुरावा करण्यात गेले़२०१७-१८ या वर्षात ४६ पैकी ४१ योजनांना तांत्रिक मंजुरी शासनाकडून मिळाली व २८ योजनांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले़ परंतु अद्यापही प्रत्यक्षात काम सुरू करावयास अडथळे आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या मदतीने ही योजना राबविण्यात येत आहे़ टप्पा क्रमांक १ मध्ये २१ योजना, टप्पा २ मध्ये ६ तर टप्पा क्रमांक ३ मध्ये १ योजना मार्गी लागणार आहे़ परंतु प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त या उन्हाळ्यात तरी होईल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे़या योजना टप्पानिहाय सुरू आहे़ तांत्रिक मान्यता जसजशी मिळत आहे़ तशा या योजनेतील कामे मार्गी लागत आहे़ संपूर्ण कामे करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याचे जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी