शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलाखत : देशात भाजपाविरोधात प्रचंड असंतोष : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:04 IST

केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविरोधी पक्षाचे ऐक्य अत्यावश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.लोकमतशी विशेष बातचीत करताना त्यांनी निवडणुकांसह विविध विषयावर भाष्य केले. येत्या लोकसभा व विधानसभेची निवडणूक लक्षात घेता बीआरएसपीने राज्यभरात तयारी चालविली आहे. लोकांमध्ये भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. होऊ घातलेल्या पाच राज्याच्या निवडणुकांत भाजपाला फटका बसेल. अशावेळी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गैरभाजपा, गैरशिवसेना अशा सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी उभी राहणे गरजेचे आहे. आम्ही एकत्रीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. आघाडी झाल्यास राज्यात दोन लोकसभेच्या जागांची आमची मागणी आहे. मात्र आघाडी झाली नाही तर राज्यात लोकसभेच्या ४० व विधानसभेच्या २०० च्यावर जागा लढण्याची आमची तयारी आहे. त्याअंतर्गत नुकतेच विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र कोकण भागात अधिवेशनाचे आयोजन पक्षातर्फे करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेससह  राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड आदी पक्ष व संघटनांना आम्ही बोलाविले होते. ओबीसी, आदिवासी यांच्यासह लहानमोठ्या पक्ष, संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही एक पर्याय निश्चितच देऊ असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला. आंबेडकरी राजकारणाला आरक्षण, अ‍ॅट्रासिटी व स्कॉलरशीपच्या चौकटीत बांधण्यात आले आहे. मात्र आपल्याला शेतकरी, रोजगार याबाबत धोरणात्मक निर्णयाद्वारे आंबेडकरी राजकारणाची व्यापकता लोकांना दाखवून द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले.बसपाचे अस्तित्वच धोक्यातबहुजन समाज पक्षाची देशात वाईट अवस्था आहे. मिशनचे कार्यकर्ते दूर गेले असून केवळ निवडणुकांपुरते राजकारण उरलेले आहे. विविध राज्यातील समीकरणे हाताळण्यात नेतृत्व अपयशी ठरले आहे. येत्या निवडणुकांनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अस्तित्वावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बसपाचे अस्तित्व विदर्भापुरते मर्यादित होते, मात्र येथेही मतांची टक्केवारी कमी झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यात बीआरएसपीला बऱ्यापैकी यश आल्याचा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला.बाळासाहेबांनी भूमिकेचा पुनर्विचार करावामहाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या ऐक्याच्या प्रक्रियेत प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी सध्याच्या आडमुठ्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्यांनी सोयीचे समीकरण करू नये. संविधान बचावचा टाहो फोडण्यापेक्षा संविधानविरोधी पक्षांना सत्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यामध्ये भाजप-शिवसेनेच्या विजयाचे खापर बाळासाहेबांवरच फुटेल, असे मत डॉ. माने यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :interviewमुलाखतPoliticsराजकारण