शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलाखत : देशात भाजपाविरोधात प्रचंड असंतोष : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:04 IST

केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविरोधी पक्षाचे ऐक्य अत्यावश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.लोकमतशी विशेष बातचीत करताना त्यांनी निवडणुकांसह विविध विषयावर भाष्य केले. येत्या लोकसभा व विधानसभेची निवडणूक लक्षात घेता बीआरएसपीने राज्यभरात तयारी चालविली आहे. लोकांमध्ये भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. होऊ घातलेल्या पाच राज्याच्या निवडणुकांत भाजपाला फटका बसेल. अशावेळी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गैरभाजपा, गैरशिवसेना अशा सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी उभी राहणे गरजेचे आहे. आम्ही एकत्रीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. आघाडी झाल्यास राज्यात दोन लोकसभेच्या जागांची आमची मागणी आहे. मात्र आघाडी झाली नाही तर राज्यात लोकसभेच्या ४० व विधानसभेच्या २०० च्यावर जागा लढण्याची आमची तयारी आहे. त्याअंतर्गत नुकतेच विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र कोकण भागात अधिवेशनाचे आयोजन पक्षातर्फे करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेससह  राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड आदी पक्ष व संघटनांना आम्ही बोलाविले होते. ओबीसी, आदिवासी यांच्यासह लहानमोठ्या पक्ष, संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही एक पर्याय निश्चितच देऊ असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला. आंबेडकरी राजकारणाला आरक्षण, अ‍ॅट्रासिटी व स्कॉलरशीपच्या चौकटीत बांधण्यात आले आहे. मात्र आपल्याला शेतकरी, रोजगार याबाबत धोरणात्मक निर्णयाद्वारे आंबेडकरी राजकारणाची व्यापकता लोकांना दाखवून द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले.बसपाचे अस्तित्वच धोक्यातबहुजन समाज पक्षाची देशात वाईट अवस्था आहे. मिशनचे कार्यकर्ते दूर गेले असून केवळ निवडणुकांपुरते राजकारण उरलेले आहे. विविध राज्यातील समीकरणे हाताळण्यात नेतृत्व अपयशी ठरले आहे. येत्या निवडणुकांनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अस्तित्वावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बसपाचे अस्तित्व विदर्भापुरते मर्यादित होते, मात्र येथेही मतांची टक्केवारी कमी झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यात बीआरएसपीला बऱ्यापैकी यश आल्याचा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला.बाळासाहेबांनी भूमिकेचा पुनर्विचार करावामहाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या ऐक्याच्या प्रक्रियेत प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी सध्याच्या आडमुठ्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्यांनी सोयीचे समीकरण करू नये. संविधान बचावचा टाहो फोडण्यापेक्षा संविधानविरोधी पक्षांना सत्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यामध्ये भाजप-शिवसेनेच्या विजयाचे खापर बाळासाहेबांवरच फुटेल, असे मत डॉ. माने यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :interviewमुलाखतPoliticsराजकारण