शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

विशेष मुलाखत : देशात भाजपाविरोधात प्रचंड असंतोष : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:04 IST

केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविरोधी पक्षाचे ऐक्य अत्यावश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.लोकमतशी विशेष बातचीत करताना त्यांनी निवडणुकांसह विविध विषयावर भाष्य केले. येत्या लोकसभा व विधानसभेची निवडणूक लक्षात घेता बीआरएसपीने राज्यभरात तयारी चालविली आहे. लोकांमध्ये भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. होऊ घातलेल्या पाच राज्याच्या निवडणुकांत भाजपाला फटका बसेल. अशावेळी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गैरभाजपा, गैरशिवसेना अशा सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी उभी राहणे गरजेचे आहे. आम्ही एकत्रीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. आघाडी झाल्यास राज्यात दोन लोकसभेच्या जागांची आमची मागणी आहे. मात्र आघाडी झाली नाही तर राज्यात लोकसभेच्या ४० व विधानसभेच्या २०० च्यावर जागा लढण्याची आमची तयारी आहे. त्याअंतर्गत नुकतेच विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र कोकण भागात अधिवेशनाचे आयोजन पक्षातर्फे करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेससह  राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड आदी पक्ष व संघटनांना आम्ही बोलाविले होते. ओबीसी, आदिवासी यांच्यासह लहानमोठ्या पक्ष, संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही एक पर्याय निश्चितच देऊ असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला. आंबेडकरी राजकारणाला आरक्षण, अ‍ॅट्रासिटी व स्कॉलरशीपच्या चौकटीत बांधण्यात आले आहे. मात्र आपल्याला शेतकरी, रोजगार याबाबत धोरणात्मक निर्णयाद्वारे आंबेडकरी राजकारणाची व्यापकता लोकांना दाखवून द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले.बसपाचे अस्तित्वच धोक्यातबहुजन समाज पक्षाची देशात वाईट अवस्था आहे. मिशनचे कार्यकर्ते दूर गेले असून केवळ निवडणुकांपुरते राजकारण उरलेले आहे. विविध राज्यातील समीकरणे हाताळण्यात नेतृत्व अपयशी ठरले आहे. येत्या निवडणुकांनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अस्तित्वावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बसपाचे अस्तित्व विदर्भापुरते मर्यादित होते, मात्र येथेही मतांची टक्केवारी कमी झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यात बीआरएसपीला बऱ्यापैकी यश आल्याचा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला.बाळासाहेबांनी भूमिकेचा पुनर्विचार करावामहाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या ऐक्याच्या प्रक्रियेत प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी सध्याच्या आडमुठ्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्यांनी सोयीचे समीकरण करू नये. संविधान बचावचा टाहो फोडण्यापेक्षा संविधानविरोधी पक्षांना सत्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यामध्ये भाजप-शिवसेनेच्या विजयाचे खापर बाळासाहेबांवरच फुटेल, असे मत डॉ. माने यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :interviewमुलाखतPoliticsराजकारण