शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा घटल्या, प्रवेशाचा टक्का वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 10:53 IST

यंदा जागा घटल्याने प्रवेशाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. २०१४ सालापासून ६ वर्षांत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३५ हजारांहून अधिक जागा कमी झाल्या आहेत हे विशेष.

ठळक मुद्दे६ वर्षांत ३५ हजारांहून अधिक जागा घटल्या

योगेश पांडेनागपूर : अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नसली तरी महाविद्यालयांकडून तयारी करण्यात आली आहे. महाविद्यालयांपुढे कोरोनामुळे मोठे आव्हान उभे ठाकले असले तरी यंदा जागा घटल्याने प्रवेशाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. २०१४ सालापासून ६ वर्षांत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३५ हजारांहून अधिक जागा कमी झाल्या आहेत हे विशेष.

२०१४-१५ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता प्रवेश क्षमतेत घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१४-१५ साली राज्यभरातील शासकीय, खासगी महाविद्यालयात मिळून १ लाख ७० हजार ५ इतक्या जागा होत्या. त्यानंतर सातत्याने जागांमध्ये घट होत गेली. विविध कारणांमुळे महाविद्यालयांतील तुकड्या किंवा शाखा कमी होत गेल्या. २०१८-१९ साली जागांचा आकडा १ लाख ४४ हजारांवर आला तर २०२०-२१ मध्ये १ लाख ३४ हजार ७७६ जागाच प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. सहा वर्षांतील टक्केवारी काढली तर राज्यभरात २०.७२ टक्के जागा घटल्या. मात्र यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा भर हा राज्यातीलच महाविद्यालयांत प्रवेशावर राहणार आहे. एकीकडे जागांचे प्रमाण कमी झाले असताना या स्थितीमुळे रिक्त जागांचे प्रमाणदेखील घटण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.- प्लेसमेंट वाढल्याचा फायदा होणार२०१४-१५ साली राज्यात ३८० महाविद्यालये होती. यंदाच्या शैक्षणिक सत्रात ३५४ महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. प्लेसमेंटचे प्रमाण काहिसे घटल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती व त्यामुळे काही महाविद्यालये बंद झाली. मात्र प्लेसमेंट वाढत असल्यामुळे विद्यार्थी परत अभियांत्रिकीकडे वळण्याची चिन्हे असून यंदा स्थिती बदललेली दिसेल असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय प्रभारी सहसंचालक डॉ. राम निबुदे यांनी व्यक्त केले,- १ लाख ३४ हजार जागांसाठी प्रवेशअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या आकडेवारीनुसार २०१९-२० मध्ये राज्यात अभियांत्रिकीच्या १ लाख ३५ हजार ३१२ जागा होत्या. २०१०-२१ मध्ये यात घट झाली असून यंदा १ लाख ३४ हजार ७७६ जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र