शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

सपा-बसपा आघाडीने भाजपला फारसे नुकसान नाही :राम चरित्र निषाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:56 IST

देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो व तेथील राजकीय समीकरणांमुळे देशाच्या राजकारणाची दिशा ठरते. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षासोबत जर काँग्रेसनेदेखील हातमिळवणी केली असती तर भाजपासमोरील आव्हान वाढले असते. मात्र केवळ सपा-बसपा आघाडीमुळे भाजपाला उत्तर प्रदेशात फारसे नुकसान होणार नाही, असा विश्वास मछलीशहरचे भाजप खासदार राम चरित्र निषाद यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसवर्ण आरक्षणामुळे भाजपाला फायदाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो व तेथील राजकीय समीकरणांमुळे देशाच्या राजकारणाची दिशा ठरते. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षासोबत जर काँग्रेसनेदेखील हातमिळवणी केली असती तर भाजपासमोरील आव्हान वाढले असते. मात्र केवळ सपा-बसपा आघाडीमुळे भाजपाला उत्तर प्रदेशात फारसे नुकसान होणार नाही, असा विश्वास मछलीशहरचे भाजप खासदार राम चरित्र निषाद यांनी व्यक्त केला. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी नागपुरात आले असता त्यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांची त्यांच्या ‘यवतमाळ हाऊस’ या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये जातीय समीकरण फार महत्त्वाचे ठरते. सपा, बसपा, काँग्रेस, भाजपा यांची स्वतंत्र ‘व्होट बँक’देखील आहे. मात्र निवडणुकात मतांचे ध्रुवीकरण होईल. त्यामुळे भाजपाला फारसे नुकसान होणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये ७५ हून अधिक जागांचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले आहे व त्यात यश मिळेल, असे प्रतिपादन निषाद यांनी केले. विविध राज्यांमध्ये सवर्णांच्या नाराजीमुळे ‘नोटा’चे प्रमाण वाढले होते. मात्र इतर मागासवर्गीय जातीमधून आलेल्या एका पंतप्रधानाने सवर्णांना आर्थिक आधारावर आरक्षण दिले. त्यामुळे सवर्ण निश्चित निवडणुकात भाजपासोबत येतील, असा अंदाजदेखील त्यांनी व्यक्त केला.राममंदिराबाबत जनतेसोबतच संघाकडून अध्यादेश आणण्याची मागणी होत आहे. मात्र न्यायालयात प्रकरण आहे. संघ स्वयंसेवकात काही प्रमाणात नाराजी नक्कीच आहे. मात्र संघ भाजपाचा कणा आहे व ही नाराजी लवकरच दूर होईल, असे निषाद म्हणाले. तत्पूर्वी विजय दर्डा यांनी निषाद यांचे स्वागत केले.गडकरींच्या नेतृत्वात गंगेचे स्वरूप पालटतेयराम चरित्र निषाद यांच्या मतदारसंघात वाराणसीचादेखील भाग येतो. देशाचे वाराणसी व गंगा नदी शुद्धीकरणाकडे लक्ष लागले आहे. याबाबत विचारणा केली असता नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात गंगा नदी बऱ्यापैकी स्वच्छ झाली आहे. पुढील पाच वर्षांत १०० टक्के गंगा स्वच्छ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाराणसीचेदेखील चित्र बदलत असून, शहराचा विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी व नितीन गडकरी हे दोघेही आपापल्या ठिकाणी उत्तम काम करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.योगी मेहनती, मात्र अनुभवाची थोडी कमीयोगी आदित्यनाथ यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत त्यांना विचारणा केली असता योगी मेहनती आहेत, मात्र त्यांचा अनुभव थोडा कमी पडत असल्याचे मत राम चरित्र निषाद यांनी व्यक्त केले. योगी काम करण्यात उत्साही आहेत. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्याने थोड्या फार त्रुटी राहत आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वात प्रदेशाचा विकास होत आहे, असे निषाद यांनी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदार