शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आता सोयाबीनवरही आला ‘व्हायरस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:24 IST

कधी पाऊस चांगला होतो, तर कधी दुष्काळी स्थिती. या दोन्हीमध्ये शेतीवरील संकट काही कमी होताना दिसत नाही. यंदा चांगले पीक येईल, असा अंदाज होता. पण त्यावर पाणी फेरणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील काही भागामध्ये सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक व्हायरस’चा प्रादुर्भाव वाढला आहे.

ठळक मुद्देपाने पडताहेत पिवळी : कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शिवारात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधी पाऊस चांगला होतो, तर कधी दुष्काळी स्थिती. या दोन्हीमध्ये शेतीवरील संकट काही कमी होताना दिसत नाही. यंदा चांगले पीक येईल, असा अंदाज होता. पण त्यावर पाणी फेरणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील काही भागामध्ये सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक व्हायरस’चा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पाने पिवळी पडत आहेत.कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी खरीपाचे ५ लाख १०० हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. त्यात सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ८५ हजार हेक्टर इतके होते. परंतु शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनला प्राधान्य दिले. त्यामुळे आजपर्यंत १ लाख २ हजार हेक्टरवर आतापर्यंत सोयाबीनची पेरणी झाली आहे. पण सततच्या पावसामुळे जमिनीला ओल आल्याने झाडाच्या मुळाशी अन्न शोषण करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. येलो मोझॅक व्हायरसने सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. हरीश सवई व वनस्पती रोग शास्त्र विभागाचे डॉ. मोहन पाटील यांच्या पथकाने जिल्ह्यातील काही शेतीची पाहणी केली. सोयाबीनवर येलो मोझॅक व्हायरसबरोबरच खोडमाशी आणि चक्रीभूंगा किडीचा प्रादूर्भाव दिसून आला.या सांगितल्या उपाययोजनाशेतात पाणी साचून असल्यामुळे झाडांच्या मुळाद्वारे अन्न शोषण करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. जमिनीत पुरेशी हवा नसल्याने झाडावरील पाने पिवळी पडत आहेत. त्यासाठी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करणे, चर काढणे आदी उपाययोजना आहेत. तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडांची पाने, फुले, शेंगा गळत आहेत. थोड्या प्रमाणात मुळसड रोगाचा प्रादूर्भाव असून, पानावर २-३ टक्के प्रमाणात बुरशीमुळे ठिपके पडलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी १० ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा २५ ग्राम कॉपर ऑक्सिक्लोरायईची फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती