शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

सोयाबीनला भाव केवळ ३,३०० रुपये; अतिवृष्टी, हमीभाव मिळेना, सरकारी उदासीनतेमुळे शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:16 IST

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना : कळमना बाजार समितीत भाव कोसळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार, ३० रोजी सोयाबीनला दर्जानुसार प्रतिक्विंटल अवघा ३,३०० ते ४,२५० रुपयांदरम्यान भाव मिळाला. हा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असून, बाजारात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने जाहीर केलेला हमीभाव प्रतिक्विंटल ५,१४० रुपये असताना, प्रत्यक्षात मिळणारा दर त्यापेक्षा शेकडो रुपयांनी कमी आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दर्जा निकृष्ट

या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, बाजारात येणाऱ्या सोयाबीनला डाग पडले असून, दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकारी खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत

राज्य सरकारकडून सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, व्यापारी मनमानी दर ठरवत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळावा, नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून भरपाई देण्यात यावी आणि सरकारी खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करण्याची शेतकरी संघटनांची मागणी आहे.

खर्च वाढला, उत्पादन कमी, शेतकरी अडचणीत

यंदा शेतकऱ्यांच्या एकरी सरासरी अडीच ते तीन क्विंटलच उत्पादन मिळाले. याउलट, सोयाबीन लागवडीसाठी एकरी १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अशा परिस्थितीत सध्याच्या भावात तो खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हंगामात सोयाबीन लागवड करायची की नाही, या संभ्रमात आहेत. दरवर्षी खते, मजुरी आणि इंधनाचे दर वाढतात; पण सोयाबीनचा भाव मात्र तसाच राहतो. खर्च वाढूनही दर न वाढल्याने शेतकऱ्यांची परवड होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा हंगाम तीन आठवड्यांत संपण्याची भीती

नागपूर जिल्ह्यात कुही, मांडळ, उमरेड, पारशिवनी आणि मौदा या भागांत प्रामुख्याने सोयाबीनची लागवड झाली. मात्र, पावसामुळे पीक कमी आले. त्यामुळे यंदा कळमन्यात तीन आठवड्यांत सोयाबीनचा हंगाम संपेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर शेतकऱ्यांच्या नाराजीचे वारे आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी कळमन्यात सोयाबीनचा दर ४,४६० रुपयांपर्यंत गेला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा भाव कोसळून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. सध्या दररोज २ हजार ते २,५०० पोत्यांची आवक होत असून, गुणवत्तेच्या अभावामुळे दर घसरले आहेत. यावर्षी सोयाबीनचा हंगाम पुढे १५ ते २० दिवसच राहणार असून, त्यानंतर आवक बंद होण्याची भीती आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत कळमन्यात या हंगामात दररोज ५ ते ६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक व्हायची. ही आवक काही वर्षांआधी १० हजार क्विंटलपर्यंत होती. यंदा गुणवत्तेअभावी सोयाबीनला भाव मिळत नसल्याचे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजार असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे यांनी यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean prices crash to ₹3,300; farmers distressed by losses.

Web Summary : Soybean prices plummet to ₹3,300 in Nagpur due to rain damage and lack of government support. Farmers face losses as costs rise, yields fall, and government purchase centers remain closed, leaving them reliant on private traders.
टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीSoybeanसोयाबीन