शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला भाव केवळ ३,३०० रुपये; अतिवृष्टी, हमीभाव मिळेना, सरकारी उदासीनतेमुळे शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:16 IST

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना : कळमना बाजार समितीत भाव कोसळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार, ३० रोजी सोयाबीनला दर्जानुसार प्रतिक्विंटल अवघा ३,३०० ते ४,२५० रुपयांदरम्यान भाव मिळाला. हा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असून, बाजारात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने जाहीर केलेला हमीभाव प्रतिक्विंटल ५,१४० रुपये असताना, प्रत्यक्षात मिळणारा दर त्यापेक्षा शेकडो रुपयांनी कमी आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दर्जा निकृष्ट

या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, बाजारात येणाऱ्या सोयाबीनला डाग पडले असून, दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकारी खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत

राज्य सरकारकडून सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, व्यापारी मनमानी दर ठरवत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळावा, नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून भरपाई देण्यात यावी आणि सरकारी खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करण्याची शेतकरी संघटनांची मागणी आहे.

खर्च वाढला, उत्पादन कमी, शेतकरी अडचणीत

यंदा शेतकऱ्यांच्या एकरी सरासरी अडीच ते तीन क्विंटलच उत्पादन मिळाले. याउलट, सोयाबीन लागवडीसाठी एकरी १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अशा परिस्थितीत सध्याच्या भावात तो खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हंगामात सोयाबीन लागवड करायची की नाही, या संभ्रमात आहेत. दरवर्षी खते, मजुरी आणि इंधनाचे दर वाढतात; पण सोयाबीनचा भाव मात्र तसाच राहतो. खर्च वाढूनही दर न वाढल्याने शेतकऱ्यांची परवड होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा हंगाम तीन आठवड्यांत संपण्याची भीती

नागपूर जिल्ह्यात कुही, मांडळ, उमरेड, पारशिवनी आणि मौदा या भागांत प्रामुख्याने सोयाबीनची लागवड झाली. मात्र, पावसामुळे पीक कमी आले. त्यामुळे यंदा कळमन्यात तीन आठवड्यांत सोयाबीनचा हंगाम संपेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर शेतकऱ्यांच्या नाराजीचे वारे आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी कळमन्यात सोयाबीनचा दर ४,४६० रुपयांपर्यंत गेला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा भाव कोसळून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. सध्या दररोज २ हजार ते २,५०० पोत्यांची आवक होत असून, गुणवत्तेच्या अभावामुळे दर घसरले आहेत. यावर्षी सोयाबीनचा हंगाम पुढे १५ ते २० दिवसच राहणार असून, त्यानंतर आवक बंद होण्याची भीती आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत कळमन्यात या हंगामात दररोज ५ ते ६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक व्हायची. ही आवक काही वर्षांआधी १० हजार क्विंटलपर्यंत होती. यंदा गुणवत्तेअभावी सोयाबीनला भाव मिळत नसल्याचे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजार असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे यांनी यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean prices crash to ₹3,300; farmers distressed by losses.

Web Summary : Soybean prices plummet to ₹3,300 in Nagpur due to rain damage and lack of government support. Farmers face losses as costs rise, yields fall, and government purchase centers remain closed, leaving them reliant on private traders.
टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीSoybeanसोयाबीन