शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील नागरिकांचे होणार समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:05 IST

दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे२८ व २९ रोजी  येथे समाधान शिबिर : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनअर्ज स्वीकारणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी हैद्राबाद हाऊस येथे आयोजित पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित असलेले प्रश्न थेट संबंधित विभागांकडून सोडविण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग या शिबिरात मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना प्रत्येक वॉर्डातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न व प्रलंबित कामे समाधान शिबिराच्या माध्यमातून सोडविण्याची सूचना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. हैद्र्राबाद हाऊस येथे विभागनिहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. १८ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्यात येऊन २५ एप्रिलपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर कारवाई होऊन २८ व २९ एप्रिल रोजी आयोजित समाधान शिबिरामध्ये प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.पत्रपरिषदेत महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, संदीप जोशी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आशा पठाण आदी उपस्थित होते.या विभागांशी संबंधित तक्रारी अर्ज स्वीकारणारसमाधान शिबिरामध्ये नागपूर महानगरपालिका संबंधित सर्व विभागाशी असलेले अर्ज अथवा तक्रारी, नागपूर सुधार प्रन्यास, पुरवठा विभाग, अन्न सुरक्षा योजना, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, वीज वितरण कंपनी, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ (म्हाडा), प्रादेशिक परिवहन कार्यालय, समाज कल्याण, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार मंडळ, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विभाग, पोलीस विभाग, मतदार नोंदणी, जिल्हा महिला व बाल विकास, जात पडताळणी समिती, जिल्हा अग्रणी बँक, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी विभागांमार्फत जनतेला उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवे संबंधात असलेल्या तक्रारींची सोडवणूक करण्यात येणार आहे.आधार कार्डसाठी एक दिवस विशेष समाधान शिबिर दोन दिवसाचे असले तरी आधार कार्ड संबंधित कामांसाठी एक दिवस आणखी वाढवण्यात येणार आहे. ३० एप्रिलपर्यंत हे शिबिर चालेल.इतर विधानसभा मतदार संघातही होणार शिबिरसमाधान शिबिराचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात विधानसभानिहाय समाधान शिबिर पार पडले. दुस ऱ्या  टप्प्यात दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघापासून याची सुरुवात होत आहे. यानंतर इतर विधानसभा मतदार संघातही अशी शिबिरे घेतली जातील, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.१४ एप्रिल रोजी मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन योजना पोहोचवणारशासनाच्या मागासवर्गीयांसाठी विविध योजना आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर