शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील नागरिकांचे होणार समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:05 IST

दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे२८ व २९ रोजी  येथे समाधान शिबिर : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनअर्ज स्वीकारणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी हैद्राबाद हाऊस येथे आयोजित पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित असलेले प्रश्न थेट संबंधित विभागांकडून सोडविण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग या शिबिरात मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना प्रत्येक वॉर्डातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न व प्रलंबित कामे समाधान शिबिराच्या माध्यमातून सोडविण्याची सूचना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. हैद्र्राबाद हाऊस येथे विभागनिहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. १८ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्यात येऊन २५ एप्रिलपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर कारवाई होऊन २८ व २९ एप्रिल रोजी आयोजित समाधान शिबिरामध्ये प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.पत्रपरिषदेत महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, संदीप जोशी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आशा पठाण आदी उपस्थित होते.या विभागांशी संबंधित तक्रारी अर्ज स्वीकारणारसमाधान शिबिरामध्ये नागपूर महानगरपालिका संबंधित सर्व विभागाशी असलेले अर्ज अथवा तक्रारी, नागपूर सुधार प्रन्यास, पुरवठा विभाग, अन्न सुरक्षा योजना, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, वीज वितरण कंपनी, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ (म्हाडा), प्रादेशिक परिवहन कार्यालय, समाज कल्याण, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार मंडळ, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विभाग, पोलीस विभाग, मतदार नोंदणी, जिल्हा महिला व बाल विकास, जात पडताळणी समिती, जिल्हा अग्रणी बँक, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी विभागांमार्फत जनतेला उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवे संबंधात असलेल्या तक्रारींची सोडवणूक करण्यात येणार आहे.आधार कार्डसाठी एक दिवस विशेष समाधान शिबिर दोन दिवसाचे असले तरी आधार कार्ड संबंधित कामांसाठी एक दिवस आणखी वाढवण्यात येणार आहे. ३० एप्रिलपर्यंत हे शिबिर चालेल.इतर विधानसभा मतदार संघातही होणार शिबिरसमाधान शिबिराचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात विधानसभानिहाय समाधान शिबिर पार पडले. दुस ऱ्या  टप्प्यात दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघापासून याची सुरुवात होत आहे. यानंतर इतर विधानसभा मतदार संघातही अशी शिबिरे घेतली जातील, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.१४ एप्रिल रोजी मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन योजना पोहोचवणारशासनाच्या मागासवर्गीयांसाठी विविध योजना आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर