शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

भारतीय ज्ञान तंत्रानेच 'ग्लोबल वार्मिंग'च्या संकटाचे समाधान

By निशांत वानखेडे | Updated: January 11, 2024 18:18 IST

डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या गावामध्ये जलसंचय करून विहिरींमध्ये १५० फुटावर गेलेल्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले, याची माहिती दिली.

नागपूर : भारतीय लाेक पूर्वी पंचमहाभूतालाच ईश्वर मानत हाेते, म्हणूनच निसर्ग सुरक्षित हाेता. या ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्याने हवामान बदल, ग्लाेबल वार्मिंग या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय ज्ञान तंत्रातच 'ग्लोबल वार्मिंग' च्या संकटाचे समाधान शक्य आहे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जलबिरादरी नागपूर जिल्हा नदी समन्वयक आणि विद्यापीठ शताब्दी महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला जाणूया नदीला’ कार्यक्रम गुरुवारी जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात पार पडला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, जलबिरादरी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चूग, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या गावामध्ये जलसंचय करून विहिरींमध्ये १५० फुटावर गेलेल्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले, याची माहिती दिली. गावातील नागरिकांना १५ कि.मी. दूरून पाणी आणावे लागत होते. निसर्गाला हानी न पोहोचवितागावाच्या बाजूला बंधारे निर्माण करत पाण्याची साठवणूक करणे सुरू केले. स्थानिक संसाधनांचा वापर यामध्ये केल्याने ते अधिक टिकाऊ बनले आणि पाण्याची साठवणूक होऊ लागली. निर, नारी, नदी म्हणजेच नारायण असल्याचे ते म्हणाले. डॉ. सुभाष चौधरी म्हणाले, पूर्वी मानवाचा समूह स्थायी होत असताना पाण्याचा स्त्रोत अर्थात नदी असलेल्या ठिकाणी स्थिरावत होते. तिथूनच मानवाच्या जीवनाला सुरुवात होत असल्याने नदी ही जीवनदायी असल्याची भावना व्यक्त केली. संचालन डॉ. अमृता इंदुरकर यांनी केले. डॉ. सोपानदेव पिसे यांनी आभार मानले.

वर्धा येथे आज आयोजन'चला जाणूया नदीला' कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सकाळी ११ वाजता निसर्ग हिल ऑक्सिजन पार्क, वर्धा येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जलपुरुष माननीय डॉ. राजेंद्रसिंह उपस्थित राहणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूर