शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय ज्ञान तंत्रानेच 'ग्लोबल वार्मिंग'च्या संकटाचे समाधान

By निशांत वानखेडे | Updated: January 11, 2024 18:18 IST

डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या गावामध्ये जलसंचय करून विहिरींमध्ये १५० फुटावर गेलेल्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले, याची माहिती दिली.

नागपूर : भारतीय लाेक पूर्वी पंचमहाभूतालाच ईश्वर मानत हाेते, म्हणूनच निसर्ग सुरक्षित हाेता. या ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्याने हवामान बदल, ग्लाेबल वार्मिंग या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय ज्ञान तंत्रातच 'ग्लोबल वार्मिंग' च्या संकटाचे समाधान शक्य आहे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जलबिरादरी नागपूर जिल्हा नदी समन्वयक आणि विद्यापीठ शताब्दी महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला जाणूया नदीला’ कार्यक्रम गुरुवारी जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात पार पडला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, जलबिरादरी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चूग, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या गावामध्ये जलसंचय करून विहिरींमध्ये १५० फुटावर गेलेल्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले, याची माहिती दिली. गावातील नागरिकांना १५ कि.मी. दूरून पाणी आणावे लागत होते. निसर्गाला हानी न पोहोचवितागावाच्या बाजूला बंधारे निर्माण करत पाण्याची साठवणूक करणे सुरू केले. स्थानिक संसाधनांचा वापर यामध्ये केल्याने ते अधिक टिकाऊ बनले आणि पाण्याची साठवणूक होऊ लागली. निर, नारी, नदी म्हणजेच नारायण असल्याचे ते म्हणाले. डॉ. सुभाष चौधरी म्हणाले, पूर्वी मानवाचा समूह स्थायी होत असताना पाण्याचा स्त्रोत अर्थात नदी असलेल्या ठिकाणी स्थिरावत होते. तिथूनच मानवाच्या जीवनाला सुरुवात होत असल्याने नदी ही जीवनदायी असल्याची भावना व्यक्त केली. संचालन डॉ. अमृता इंदुरकर यांनी केले. डॉ. सोपानदेव पिसे यांनी आभार मानले.

वर्धा येथे आज आयोजन'चला जाणूया नदीला' कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सकाळी ११ वाजता निसर्ग हिल ऑक्सिजन पार्क, वर्धा येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जलपुरुष माननीय डॉ. राजेंद्रसिंह उपस्थित राहणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूर